शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2023 15:43 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले

सांगली : राज्यातील एसटी महामंडळ खासगी शिवशाही बसेसमुळे तोट्यात गेले असताना राज्य सरकार १८९५० खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एसटीच्या ४० हजार एकर जागांवर गृहविभागाचा डोळा असून त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.शिंदे, ताटे म्हणाले की, शिवशाही बसेसमुळे लालपरी आर्थिक संकटात आली असतानाही त्याकडे राज्य शासनाने गांभीऱ्याने लक्ष दिले नाही. या प्रश्नांवर गांभीऱ्याने विचार करण्याऐवजी राज्य शासनाने पुन्हा १८ हजार ९५० खासगी बसेस चालक व वाहकांसह एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापैकी पहिल्या वर्षी ९५०, दुसऱ्या वर्षी २५००, तिसऱ्या वर्षी ३५००, चौथ्या वर्षी ५००० आणि पाचव्या वर्षी ७००० असे एकूण १८९५० बसेस राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लालपरीचे अस्तित्वच संपणार आहे. एसटीचे खासगीकरण करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांबरोबर जनतेनही आवाज उठविण्याची गरज आहे. एसटी बसेसचे खासगीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला एसटीच्या मोकळ्या जागांवर सरकारचा डोळा आहे. एसटीच्या मोकळ्या जागा आमचा दागिना आहे. पूर्वीपासून या जागा सांभाळण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बसस्थानक उभारले त्याच ठिकाणी शहर, गावे वसली आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल, एलआयसीबद्दल जे झाले ते एसटीबद्दल घडू नये; अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू कराराज्य शासनाने काही महामंडळ व काही संस्थांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेले आहे, हे अन्यायकारक आहे. म्हणून दि. १ एप्रिल २०१६ पासून एसटी कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षांची मुदत मान्य करण्यास तयार आहे, असेही शिंदे व ताटे म्हणाले.

सदावर्ते यांच्यामुळे एसटी तोट्यातॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले. एसटीचा विचार करून वेळीच आंदोलन थांबविले असते तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविता आली असती. पण, त्याकडे दुर्लक्ष करून सदावर्ते यांनी आंदोलन चालूच ठेवले. यामुळे एसटीकडे प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी तोट्यात गेलीच. पण, त्यापेक्षाही प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते चार लाख रुपयापर्यंत नुकसान झाले, अशी टीकाही संदीप शिंदे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपHome Ministryगृह मंत्रालय