शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2023 15:43 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले

सांगली : राज्यातील एसटी महामंडळ खासगी शिवशाही बसेसमुळे तोट्यात गेले असताना राज्य सरकार १८९५० खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एसटीच्या ४० हजार एकर जागांवर गृहविभागाचा डोळा असून त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.शिंदे, ताटे म्हणाले की, शिवशाही बसेसमुळे लालपरी आर्थिक संकटात आली असतानाही त्याकडे राज्य शासनाने गांभीऱ्याने लक्ष दिले नाही. या प्रश्नांवर गांभीऱ्याने विचार करण्याऐवजी राज्य शासनाने पुन्हा १८ हजार ९५० खासगी बसेस चालक व वाहकांसह एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापैकी पहिल्या वर्षी ९५०, दुसऱ्या वर्षी २५००, तिसऱ्या वर्षी ३५००, चौथ्या वर्षी ५००० आणि पाचव्या वर्षी ७००० असे एकूण १८९५० बसेस राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लालपरीचे अस्तित्वच संपणार आहे. एसटीचे खासगीकरण करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांबरोबर जनतेनही आवाज उठविण्याची गरज आहे. एसटी बसेसचे खासगीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला एसटीच्या मोकळ्या जागांवर सरकारचा डोळा आहे. एसटीच्या मोकळ्या जागा आमचा दागिना आहे. पूर्वीपासून या जागा सांभाळण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बसस्थानक उभारले त्याच ठिकाणी शहर, गावे वसली आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल, एलआयसीबद्दल जे झाले ते एसटीबद्दल घडू नये; अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू कराराज्य शासनाने काही महामंडळ व काही संस्थांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेले आहे, हे अन्यायकारक आहे. म्हणून दि. १ एप्रिल २०१६ पासून एसटी कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षांची मुदत मान्य करण्यास तयार आहे, असेही शिंदे व ताटे म्हणाले.

सदावर्ते यांच्यामुळे एसटी तोट्यातॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले. एसटीचा विचार करून वेळीच आंदोलन थांबविले असते तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविता आली असती. पण, त्याकडे दुर्लक्ष करून सदावर्ते यांनी आंदोलन चालूच ठेवले. यामुळे एसटीकडे प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी तोट्यात गेलीच. पण, त्यापेक्षाही प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते चार लाख रुपयापर्यंत नुकसान झाले, अशी टीकाही संदीप शिंदे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपHome Ministryगृह मंत्रालय