शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न, ४० हजार एकरवर गृहविभागाचा डोळा'

By अशोक डोंबाळे | Updated: January 17, 2023 15:43 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले

सांगली : राज्यातील एसटी महामंडळ खासगी शिवशाही बसेसमुळे तोट्यात गेले असताना राज्य सरकार १८९५० खासगी बसेस घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. राज्यातील एसटीच्या ४० हजार एकर जागांवर गृहविभागाचा डोळा असून त्यामुळे एसटीचे मोठे नुकसान होणार आहे, असेही ते म्हणाले.शिंदे, ताटे म्हणाले की, शिवशाही बसेसमुळे लालपरी आर्थिक संकटात आली असतानाही त्याकडे राज्य शासनाने गांभीऱ्याने लक्ष दिले नाही. या प्रश्नांवर गांभीऱ्याने विचार करण्याऐवजी राज्य शासनाने पुन्हा १८ हजार ९५० खासगी बसेस चालक व वाहकांसह एसटी महामंडळाच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यापैकी पहिल्या वर्षी ९५०, दुसऱ्या वर्षी २५००, तिसऱ्या वर्षी ३५००, चौथ्या वर्षी ५००० आणि पाचव्या वर्षी ७००० असे एकूण १८९५० बसेस राज्य सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळातील लालपरीचे अस्तित्वच संपणार आहे. एसटीचे खासगीकरण करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. या प्रश्नावर कर्मचाऱ्यांबरोबर जनतेनही आवाज उठविण्याची गरज आहे. एसटी बसेसचे खासगीकरण होत असतानाच दुसऱ्या बाजूला एसटीच्या मोकळ्या जागांवर सरकारचा डोळा आहे. एसटीच्या मोकळ्या जागा आमचा दागिना आहे. पूर्वीपासून या जागा सांभाळण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बसस्थानक उभारले त्याच ठिकाणी शहर, गावे वसली आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल, एलआयसीबद्दल जे झाले ते एसटीबद्दल घडू नये; अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत, सरचिटणीस नारायण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सातवा वेतन आयोग लागू कराराज्य शासनाने काही महामंडळ व काही संस्थांना सातवा वेतन आयोग लागू केला. मात्र एसटी कामगारांना सातव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवलेले आहे, हे अन्यायकारक आहे. म्हणून दि. १ एप्रिल २०१६ पासून एसटी कामगारांना सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा. त्यासाठी संघटना १० वर्षांची मुदत मान्य करण्यास तयार आहे, असेही शिंदे व ताटे म्हणाले.

सदावर्ते यांच्यामुळे एसटी तोट्यातॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून आंदोलन भडकविले. एसटीचा विचार करून वेळीच आंदोलन थांबविले असते तर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडविता आली असती. पण, त्याकडे दुर्लक्ष करून सदावर्ते यांनी आंदोलन चालूच ठेवले. यामुळे एसटीकडे प्रवासी कमी झाल्यामुळे एसटी तोट्यात गेलीच. पण, त्यापेक्षाही प्रत्येक कर्मचाऱ्याचे दोन ते चार लाख रुपयापर्यंत नुकसान झाले, अशी टीकाही संदीप शिंदे यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीST Strikeएसटी संपHome Ministryगृह मंत्रालय