शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

महापालिकेवर महिलांचा पाण्यासाठी हल्लाबोल घागर मोर्चा : अधिकार्‍यांना धक्काबुक्की; शिव्यांची लाखोली

By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST

सांगली : शामरावनगरमधील अपुर्‍या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला.

सांगली : शामरावनगरमधील अपुर्‍या पाणीपुरवठ्याविरोधात आज, बुधवारी संतप्त महिलांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर हल्लाबोल केला. घागरी घेऊन आलेल्या या महिलांनी अधिकार्‍यांना जाब विचारत धक्काबुक्की केली, शिव्यांची लाखोली वाहिली. काही महिला तर अंगावरही धावून गेल्या. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर पालिकेने दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र देऊन आपली सुटका करवून घेतली. शहरातील शामरावनगर परिसरातील विठ्ठलनगर, ज्ञानेश्वर कॉलनी, सुंदर कॉलनी, शिवशक्ती कॉलनी या भागात गेल्या काही महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यात आज पाणीच न आल्याने या भागातील महिला व नागरिकांनी सकाळी साडेअकरा वाजता पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर घागर मोर्चा काढला. अचानक मोर्चा आल्याने पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी नसल्याने कनिष्ठ अभियंता, पाईप निरीक्षक यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाणी का आले नाही, असा जाब विचारत महिला व नागरिकांनी कर्मचार्‍यांना धारेवर धरले. निवडणुकीत या भागात पाणी येत होते, आता निवडणुका संपल्यावर पाणी बंद झाले आहे. पालिकेकडून पाण्याचे जादा बिल आकारले जाते. हे बिल आम्ही भरतो. मग पाणी का देत नाही? अशा प्रश्नांची सरबत्तीच महिलांनी केली. कनिष्ठ अभियंता नूरमहंमद मुलाणी व पाईप निरीक्षक संतोष कुंभार यांनी या महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त महिलांनी त्यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच धक्काबुक्कीचा प्रकारही घडला. वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलाविल्याशिवाय मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. टँकरने पाणी पुरवठा करतो, असा पर्यायही पालिका कर्मचार्‍यांनी दिला. पण त्यालाही महिलांनी नकार दिला. टँकर नको, नळालाच पाणी आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. महिला व नागरिक अधिकच आक्रमक झाल्याने अखेर कर्मचार्‍यांनी मिरजेचे अभियंता बी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना पाणीपुरवठा कार्यालयात येण्याची विनंती केली. पाटील यांनीही महिलांशी चर्चा केली. अखेर दररोज पाणी देण्याचे लेखी पत्र नागरिकांना देण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. लेखी हमीनुसार पाणी आले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. या आंदोलनात माजी नगरसेवक आनंद परांजपे, प्रकाश कुलकर्णी, दत्तात्रय लोखंडे, संभाजी भोसले, राजू थोरात, पूजा भोसले, मीना रावण, गिरमल पांगे, सुवर्णा आकोळे, विमल शिकलगार, अजित कोरबू, सिंधू रावण यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)