शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

महापालिका पाणीपुरवठा अधिकार्‍यांवर हल्लाबोल

By admin | Updated: June 3, 2014 01:24 IST

अपुरा पाणीपुरवठा : दूषित पाणी कार्यालयात ओतण्याचा इशारा

सांगली : शहरातील गुलाब कॉलनी, साई मंदिर परिसर या भागात गेल्या चार महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रार करूनही पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने आज सोमवारी या परिसरातील महिलांनी पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेराव घातला. २४ तास पाणी योजनेत समावेश असूनही घागरभरही पाणी मिळत नाही. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास दूषित पाणी कार्यालयात ओतण्याचा इशाराही यावेळी दिला. गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन कोलमडले आहे. दर आठवड्याला एका भागातील महिलांचा मोर्चा पाणीपुरवठा विभागावर येत आहे. सोमवारी गुलाब कॉलनी, साईमंदिर परिसरातील नागरिक, महिलांनी मोर्चा काढला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या चार महिन्यांपासून या परिसरात दूषित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. मोर्चाला सामोरे जाताना पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील, तत्त्व ग्लोबलचे गुलाब पाटील यांच्यावर महिलांनी प्रश्नांचा भडीमार करीत घेराव घातला. महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेत हा परिसर समाविष्ट आहे. महिनाभर सुरळीत पाणी येते, नंतर मात्र अपुरा पाणीपुरवठा होतो. या परिसराच्या आजूबाजूला असलेल्या हनुमाननगरमध्ये मात्र मुबलक पाणी मिळत आहे. व्हॉलमनच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोपही महिलांनी केला. महापालिकेने लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर अधिकार्‍यांच्या कार्यालयात पाणी ओतण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. प्रभाग दोनचे सभापती युवराज गायकवाड, शंकर आष्टेकर, भारती जाधव, इंदूबाई पाटील, सिद्धू गरुड, वर्षा पाटील, रूपाली नंदे, वर्षा नरुटे, शालन पोतदार आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)