शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

आटपाडीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST

आटपाडी: ग्रामपंचायतीच्या वतीने तलावापासून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुद्धिकरण प्रकल्पाची स्वच्छता सुरू केल्याने आटपाडीकरांना आता नेहमीपेक्षा एक दिवस उशिरा ...

आटपाडी: ग्रामपंचायतीच्या वतीने तलावापासून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलशुद्धिकरण प्रकल्पाची स्वच्छता सुरू केल्याने आटपाडीकरांना आता नेहमीपेक्षा एक दिवस उशिरा पाणीपुरवठा होणार आहे. आटपाडीत सध्या पाच दिवसातून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळते. स्वच्छतेच्या कामामुळे सहा दिवसातून नागरिकांना पाणी मिळेल, अशी परिस्थिती आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी सतत कुठे ना कुठे रस्ता खोदत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नवीन रस्त्यांच्या कामामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. त्यामुळे वारंवार उन्हाळ्यात पिण्याचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो. फिल्टर प्लांट स्वच्छता करण्यात येत असल्याने सध्या पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर एक दिवस नेहमीपेक्षा उशिरा आटपाडीकरांना पाणी मिळणार आहे.

मागील दोन वर्षापूर्वी फिल्टर प्लांट कार्यान्वित करून पूर्ण गावाला स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा सुरू केलेला आहे. आटपाडी तलावातून थेट पाणी उपसा करून त्याला जवळच आटपाडी गावासाठी जलशुद्धिकरण प्रकल्प करण्यात आला आहे.

आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी फिल्टर प्लांट स्वच्छ व निर्जंतुक करणे गरजेचे असल्याने फिल्टर प्लांट पाणी शुद्धिकरण प्रकल्प स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले. नेहमीपेक्षा एक दिवस पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.

यावेळी ॲड. धनंजय पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, प्रकाश मरगळे, राजेंद्र बालटे, शिवाजी मेटकरी व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम चालू आहे.

फिल्टर प्लांट स्वच्छता मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत कदम, आरोग्य सेवक हरीराम नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.