शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

आटपाडीतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन हातघाईवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:19 IST

सोमवारपासून आटपाडी ग्रामपंचायतीच्या ४५ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ...

सोमवारपासून आटपाडी ग्रामपंचायतीच्या ४५ कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. आधीच गावाला पाच दिवसांतून पाणी मिळत हाेते. पण, कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे अनेक भागात दहा दिवस झाले, पाणी आलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी तीन बैठका घेऊनही यावर तोडगा निघत नसल्याने कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यासही कर्मचाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे शेवटी ग्रामपंचायतीने पर्यायी यंत्रणा उभी करून गावातील पाणीपुरवठा सुरू केला. काही भागात पाणी पोहोचलेही. दरम्यान, कामबंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. २५ ते ३० कर्मचारी थेट आटपाडी तलावावर पोहोचले. त्यांनी पाणीयाेजनेच्या मोटारी बंद केल्या. जलशुद्धीकरण केंद्रावरील नवीन कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊन त्यांच्याकडून पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक साधने घेऊन पाणी बंद केले.

यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. प्रकरण हातघाईवर आले. याची माहिती मिळताच सहायक निरीक्षक अजित पाटील फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कर्मचाऱ्यांना ‘आंदोलन करा, पण गावाला वेठीस धरता येणार नाही. अन्यथा, कारवाई करू’ असा इशारा दिला. त्यानंतर कर्मचारी तिथून निघून गेले.

दरम्यान, सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तातडीने जलशुद्धीकरण केंद्राजवळ पोहोचले. रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, गावात मुख्य पाण्याच्या टाकीपासून पाणी सुरू करण्यासाठी आवश्यक साधने आंदोलक कर्मचाऱ्यांनी पळवून नेल्याने पाणीपुरवठा सुरू करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या. रात्री उशिरापर्यंत सरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जलशुद्धीकरण केंद्रासमाेर ठाण मांडले हाेते.

फोटो : १० आटपाडी ३

ओळी : आटपाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच अंकुश कोळेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी ठाण मांडले हाेते.