शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

उमेदवारांकडून आश्वासनांचा धुरळा

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

मिरजेतील प्रमुख समस्या जैसे थे : विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा रणधुमाळी

सदानंद औंधे - मिरज -विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवार मिरजेच्या विकासाची आश्वासने देत आहेत. मिरज पूर्व भागातील खराब रस्ते, शहरातील पर्यायी भाजी मंडई, रस्त्यांचे रूंदीकरण, म्हैसाळ योजनेचे पाणी व स्वतंत्र मिरज टाऊनशीपसह अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही. त्यामुळे निवडणुकीनंतरही मिरजेतील विकासकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. मिरज पूर्व भागातील २८ गावांना जोडणाऱ्या खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. रस्ते प्रश्नावरून विद्यमान आमदारांवर जोरदार टीका झाली. रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आंदोलने झाली; मात्र रस्त्यांचे भाग्य उजाडले नाही. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे पाच वर्षांपूर्वी अपूर्ण होती, त्यात आजही फारसा बदल झालेला नाही. डोंगरवाडी कालव्याचे रखडलेले काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत ११ गावचे ग्रामस्थ आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भोसे तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे, यासाठी भाजपने आंदोलन केले. मात्र म्हैसाळचे पाणी भोसे गावापर्यंत पोहोचलेच नाही. टंचाई निधीतून उपलब्ध होणाऱ्या वीजबिलावरच म्हैसाळ योजना सुरू आहे. पाणी व रस्त्यांशिवाय ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधांबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता कायम आहे. शहरात पर्यायी भाजी मंडईची व्यवस्था, प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, गुंठेवारी वसाहतीत सुविधा हे प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील समस्यांची जबाबदारी महापालिकेवर ढकलून लोकप्रतिनिधींनी हात झटकले आहेत. मिरज औद्योगिक वसाहतीत खराब रस्ते, अपुऱ्या सुविधांमुळे हैराण झालेल्या उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला, मात्र अद्यापही उद्योजकांच्या समस्या जैसे थे आहेत. शासन दरबारी रखडलेल्या स्वतंत्र मिरज टाऊनशीपच्या पाठपुराव्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. सिध्देवाडी येथे नवीन औद्योगिक वसाहतीचे काम राजकीय विरोधामुळे गुंडाळण्यात आले आहे. प्रशासकीय सोयीसाठी मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याच्या निर्मितीचा प्रस्ताव रखडला आहे. मिरजेच्या कृष्णा घाटावरील पूरसंरक्षक तटभिंतीचे काम गेल्या पाच वर्षात पूर्ण झालेले नाही. मिरजेला मुस्लिम तीर्थक्षेत्राचा दर्जा व शंभर कोटी रुपये निधी देण्याची घोषणा झाली; मात्र निधी मिळविण्यासाठी महापालिका व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झालेले नाहीत. गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत असतानाच पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत संघर्ष सुरू आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याचा आरोप करीत विरोधी उमेदवारही मिरजेच्या विकासाच्या योजना घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत.ज्योतिषांकडे हेलपाटेमहापालिकेच्या निर्मितीला पंधरा वर्षे उटल्यानंतरही मिरजेतील पर्यायी भाजीमंडई, प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, सुधारित नळपाणीपुरवठा योजना, ड्रेनेज योजना रखडली आहे. महापालिकेचा कारभार सांगलीतच केंद्रीत झाल्याचे चित्र आहे. महासभा, स्थायी समिती सभाही मिरजेत होत नाही. मात्र महापालिकेत केवळ एकच समर्थक नगरसेवक असल्याने आमदारांना महापालिकेच्या कारभारात कोणतेच स्थान नाही.