शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांकडून आश्वासनांचा धुरळा

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

मिरजेतील प्रमुख समस्या जैसे थे : विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा रणधुमाळी

सदानंद औंधे - मिरज -विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच उमेदवार मिरजेच्या विकासाची आश्वासने देत आहेत. मिरज पूर्व भागातील खराब रस्ते, शहरातील पर्यायी भाजी मंडई, रस्त्यांचे रूंदीकरण, म्हैसाळ योजनेचे पाणी व स्वतंत्र मिरज टाऊनशीपसह अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. गत विधानसभा निवडणुकीत दंगलीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झालीच नाही. त्यामुळे निवडणुकीनंतरही मिरजेतील विकासकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले. मिरज पूर्व भागातील २८ गावांना जोडणाऱ्या खराब रस्त्यांमुळे ग्रामस्थ हैराण आहेत. रस्ते प्रश्नावरून विद्यमान आमदारांवर जोरदार टीका झाली. रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची आंदोलने झाली; मात्र रस्त्यांचे भाग्य उजाडले नाही. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे पाच वर्षांपूर्वी अपूर्ण होती, त्यात आजही फारसा बदल झालेला नाही. डोंगरवाडी कालव्याचे रखडलेले काम पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत ११ गावचे ग्रामस्थ आहेत. म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भोसे तलावात म्हैसाळचे पाणी सोडावे, यासाठी भाजपने आंदोलन केले. मात्र म्हैसाळचे पाणी भोसे गावापर्यंत पोहोचलेच नाही. टंचाई निधीतून उपलब्ध होणाऱ्या वीजबिलावरच म्हैसाळ योजना सुरू आहे. पाणी व रस्त्यांशिवाय ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधांबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता कायम आहे. शहरात पर्यायी भाजी मंडईची व्यवस्था, प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, गुंठेवारी वसाहतीत सुविधा हे प्रश्न प्रलंबित आहेत. शहरातील समस्यांची जबाबदारी महापालिकेवर ढकलून लोकप्रतिनिधींनी हात झटकले आहेत. मिरज औद्योगिक वसाहतीत खराब रस्ते, अपुऱ्या सुविधांमुळे हैराण झालेल्या उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला, मात्र अद्यापही उद्योजकांच्या समस्या जैसे थे आहेत. शासन दरबारी रखडलेल्या स्वतंत्र मिरज टाऊनशीपच्या पाठपुराव्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. सिध्देवाडी येथे नवीन औद्योगिक वसाहतीचे काम राजकीय विरोधामुळे गुंडाळण्यात आले आहे. प्रशासकीय सोयीसाठी मिरज तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र सांगली तालुक्याच्या निर्मितीचा प्रस्ताव रखडला आहे. मिरजेच्या कृष्णा घाटावरील पूरसंरक्षक तटभिंतीचे काम गेल्या पाच वर्षात पूर्ण झालेले नाही. मिरजेला मुस्लिम तीर्थक्षेत्राचा दर्जा व शंभर कोटी रुपये निधी देण्याची घोषणा झाली; मात्र निधी मिळविण्यासाठी महापालिका व लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न झालेले नाहीत. गत विधानसभा निवडणुकीनंतर मतदार विकासकामांच्या प्रतीक्षेत असतानाच पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीत संघर्ष सुरू आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याचा आरोप करीत विरोधी उमेदवारही मिरजेच्या विकासाच्या योजना घेऊन निवडणुकीच्या मैदानात आहेत.ज्योतिषांकडे हेलपाटेमहापालिकेच्या निर्मितीला पंधरा वर्षे उटल्यानंतरही मिरजेतील पर्यायी भाजीमंडई, प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, सुधारित नळपाणीपुरवठा योजना, ड्रेनेज योजना रखडली आहे. महापालिकेचा कारभार सांगलीतच केंद्रीत झाल्याचे चित्र आहे. महासभा, स्थायी समिती सभाही मिरजेत होत नाही. मात्र महापालिकेत केवळ एकच समर्थक नगरसेवक असल्याने आमदारांना महापालिकेच्या कारभारात कोणतेच स्थान नाही.