शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

आष्ट्याची सत्ता विरोधक उलथविणार?

By admin | Updated: October 24, 2016 00:30 IST

नगरपालिका निवडणूक : १० प्रभागांतील २१ जागांसाठी लढत

सुरेंद्र शिराळकर ल्ल आष्टा आष्टा नगरपरिषदेची निवडणूक २७ नोव्हेंबर रोजी होत आहे. पालिकेत माजी आमदार विलासराव शिंदे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील गटाची सत्ता आहे. ती उलथवून टाकण्यासाठी विरोधी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकवटले आहेत. ओबीसी महिलेसाठी नगराध्यक्षपद आरक्षित आहे. १० प्रभागातील २१ जागांसाठी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा असून सत्ताधारी विकास कामांवर, तर विरोधक भ्रष्टाचार व सत्ताधारी गटाविरोधी लाटेवर स्वार होऊन प्रचार करणार आहेत. आष्टा पालिकेत जयंत पाटील-विलासराव शिंदे गटाची सत्ता राहिली आहे. शिंदे-पाटील संघर्ष संपल्यानंतर आष्टा पालिका १९९६ नंतर विलासराव शिंदे गटाकडे आली. त्यानंतर पालिकेत बेरजेचे राजकारण करीत दोन्ही गट एकत्र आले आहेत. काही वेळा नुरा कुस्ती करण्यात आली, मात्र दोन्ही नेत्यांनी विरोधकांना पालिकेत येऊ दिले नाही. याला अपवाद फक्त २००६ ची बिनविरोध निवडणूक राहिली. विलासराव शिंदे यांनी पुत्र विशाल शिंदे यांचा अर्ज काढून शिवसेनेचे विनायक इंगवले यांना संधी दिली. त्यानंतर २०११ च्या पालिका निवडणुकीत शिंदे गट १३, तर पाटील गट ६ जागा, अशा १९ जागा लढवल्या गेल्या व त्यांनी सर्वच्या सर्व १९ जागा जिंकल्याा. विरोधक काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे व अपक्ष यांनी ५३ टक्के, तर सत्ताधारी गटाने ४७ टक्के मते मिळविली. विरोधकांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने पुन्हा सत्ताधारी गटाने बाजी मारली. गतवेळच्या पराभवाने विरोधकांनी बोध घेतला आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन आष्टा शहर लोकशाही आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेसचे राहुल थोटे, बाबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब मालगावे, दिलीप कुरणे, बी. एल. पाटील, अमोल पडळकर, शिवसेनेचे वीर कुदळे, हणमंतराव सूर्यवंशी, पोपट भानुसे, मनसेचे राजकुमार सावळवाडे, भाजपचे डॉ. सतीश बापट, स्वाभिमानीचे गुंडा भाऊ आवटी यांच्यासह कार्यकर्त्यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून सत्ताधारी गटाला आव्हान दिले आहे. सत्ताधारी गटाचे नेतृत्व विलासराव शिंदे करीत असून, आ. जयंत पाटील यांनी सर्व अधिकार शिंदे यांना दिले आहेत. १९९६ पासून शिंदे यांनी सर्व जाती-धर्माला विविध पदांवर संधी दिली आहे. शिंदे यांनी नवीन पाणीपुरवठा योजना, भाजी मंडई, फिश मार्केट, घरकुल योजनेतून सुमारे २४०० घरे, बहुउद्देशीय हॉल, १६१ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध मार्गांचे नामकरण, तसेच प्रवेशद्वार, हॉल, रस्ते यांना नावे देण्यात आली आहेत. अष्टलिंगांपैकी सात लिंगांचा जीर्णोद्धार, सर्व रस्ते, गटारी, फूटपाथ, एलईडी दिवे यांसह विविध विकासकामे शहर व उपनगरांत झाली आहेत. या विकास कामांवरच सत्ताधारी गट निवडणुकीस सामोरा जात आहे. शिंदे गटाचे शहराच्या राजकारणात प्राबल्य आहे. त्यात जयंत पाटील गट साथीला असल्याने सत्ताधारी गट पालिकेवर पुन्हा झेंडा फडकविण्याच्या तयारीत आहे. आष्टा शहराची लोकसंख्या ३७ हजार १०५ आहे. एकूण मतदार २६ हजार ९९६ असून पुरुष मतदार १४ हजार २९, तर स्त्री मतदार १२ हजार ९६७ आहेत. यापूर्वी पालिकेसाठी एकूण ५ प्रभाग होते, त्यातून १९ नगरसेवक निवडून आले. पालिकेच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी १९ ऐवजी २१ प्रभाग झाले आहेत. यासाठी एकूण १० प्रभाग असून ९ प्रभागात २ उमेदवार, तर एका प्रभागात ३ उमेदवार असणार आहेत. एकूण २१ पैकी ११ महिला, तर १० पुरुष उमेदवार आहेत. आगामी निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मताचे दान टाकणार, यावरच नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. नगराध्यक्ष आरक्षण : ओबीसी महिला नगराध्यक्षपद ओबीसी स्त्री उमेदवारासाठी राखीव असल्याने नगराध्यक्ष निवडणूक होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी लोकशाही आघाडीने माजी नगरसेवक अमोल पडळकर यांच्या पत्नी लता पडळकर यांना संधी दिली आहे, तर शिंदे गटाकडे या पदासाठी रांग लागली आहे. माजी नगराध्यक्ष रंजना शेळके, ऊर्दू हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका आयेशा इनामदार, वैशाली बोते, झिनत आत्तार, संभाजी माळी यांच्या पत्नी, जयंत पाटील गटाकडून पुष्पलता माळी, सुशिला शेळके, जमीलाबी लतीफ, माजी नगरसेविका ललिता वाकळे यांच्या स्नुषा यांच्यासह जैन समाजातील ओबीसी दाखला असणाऱ्या नेत्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. आष्टा नगराध्यक्षपद ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव आहे. शहरात धनगर, जैन, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. धनगर, मुस्लिम व इतर समाजाला संधी मिळाली आहे. जैन समाजाच्या महिलेला अद्याप संधी मिळाली नसल्याने, जयंत पाटील व विलासराव शिंदे कोणाला संधी देणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. आष्टा शहरात शिंदे व पाटील गट सत्तेत आहे. या गटाकडून संधी मिळावी म्हणून सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मात्र संधी न मिळाल्यास नाराजांची मते विरोधकांना मिळणार, अशी चर्चा आहे. रंगणार चुरशीचा सामना पालिकेसाठी अर्ज भरण्यास काही दिवस उरले आहेत. दोन्ही बाजूने खलबते सुरु आहेत. सत्ताधारी गटाच्या प्रचाराची धुरा विलासराव शिंदे, जयंत पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यावर आहे, तर विरोधी लोकशाही आघाडीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खा. राजू शेट्टी, पणनमंत्री सदाभाऊ खोत, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी वनमंत्री आ. पतंगराव कदम यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे नेते येणार आहेत. पालिकेच्या निवडणुकीनिमित्त सत्ताधारी व विरोधकांत चुरशीचा सामना रंगणार आहे.