शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

आष्टा शहर स्मार्ट सिटी बनविणार

By admin | Updated: December 16, 2014 00:12 IST

जयंत पाटील : नगरपालिकेचा हीरकमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात

आष्टा : ब्रिटिशांनी आष्टा शहराचे भौगोलिक महत्त्व ओळखून मुंबईबरोबर आष्टा पालिकेची १८५३ मध्ये स्थापना केली. आष्टा शहराला थोर परंपरेचा वारसा लाभला आहे. मोठ्या शहरात असणाऱ्या समस्या याठिकाणी नाहीत. आष्टा शहर हे सर्वसोयींनीयुक्त शहर असून, ते स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.आष्टा नगरपालिकेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सवानिमित्त आजी, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी यांचा नगरपालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, आनंदराव पाटील, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, उपनगराध्यक्ष के. सी. वग्याणी, उद्योगपती नितीन झंवर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, विराज शिंदे, प्रकाश रुकडे, मुख्याधिकारी पंकज पाटील, अभियंता चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.जयंत पाटील म्हणाले, आष्टा शहराला विलासराव शिंदे यांच्या रूपाने चांगले नेतृत्व लाभले आहे. पाणी पुरवठा, घरकुल, रस्ते, गटारी यासह लोकोपयोगी विविध योजना राबवून शहराचा सर्वांगीण विकास साधला आहे. आष्टा पालिका राज्यात आदर्श आहे. याहीपुढे जाऊन शहर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी शिंदे आणि मी प्रयत्न करणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.विलासराव शिंदे म्हणाले की, आष्टा शहर शौचालययुक्त करण्यात येणार आहे. सात तीर्थक्षेत्रांची कामे पूर्ण, रमाईसह सर्व घरकुले पूर्ण करण्यात येणार त्यांनी स्पष्ट केले.मंगलादेवी शिंदे म्हणाल्या, पूर्ण झालेल्या घरकुलात पाण्याची सोय करून लवकरच ती लाभार्थ्यांना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी माजी नगराध्यक्षा झिनत आत्तार, झुंझारराव पाटील, रंजना शेळके, जानकास ढोले, प्रणव चौगुले, विजयमाला वग्याणी, सुरेंद्र वग्याणी, भालचंद्र बोंडे, बाबा सिध्द, शेरनवाब देवळे, सतीश माळी, मारुती रेवले-पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १२ अंगणवाड्यांना पाण्याचा पिंप व सतरंजीचे वाटप करण्यात आले.मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी आयेशा इनामदार, रघुनाथ जाधव, बी. के. पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)गुणवत्ता महत्त्वाचीवस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात जयंत पाटील यांनी आगामी काळात टॅलेंटला महत्त्व देऊन गतीला साथ देणारी माणसे निवडावीत, असा सल्ला दिला.