शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शासनामुळे आटपाडीत कृत्रिम दुष्काळ

By admin | Updated: June 10, 2016 00:18 IST

जयंत पाटील : टेंभू योजनेचे पाणी येऊनही टंचाई, तालुक्यात ठिकठिकाणी बैठका

आटपाडी : आतापर्यंत इथे निसर्गाचा दुष्काळ होता, पण टेंभूचे पाणी येऊनही या भागात दुष्काळ आहे, हे सरकारच्या चुकीच्या, अदूरदर्शीपणाच्या धोरणांमुळे पडलेला कृत्रिम दुष्काळ आहे. अशा दुष्काळाला आटपाडी तालुक्याला तोंड द्यावे लागत आहे, अशी टीका माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी येथे केली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आ. जयंत पाटील यांनी बुधवारी खरसुंडी, दिघंची आणि आटपाडीत बैठक घेतली. येथील श्री कल्लेश्वर देवस्थानच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पाटील म्हणाले, टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांनी पैसे भरूनही आटपाडी तालुक्यात मिळाले नाही. सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली. जाणीवपूर्वक पाण्यापासून दूर ठेवणाऱ्यांविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे. विहित नमुन्यात अर्ज करूनही पाण्यासाठी अडवणूक केली जात असेल, त्यांना आपला नमुना दाखविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी तुमच्या पाठीशी आहे.कृष्णा नदी पावसाळ्यात भरून वाहते तेव्हा शासनाने शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची वाट न पाहता आटपाडी तालुक्यातील तलाव पाण्याने भरून द्यावेत. टेंभू योजना पूर्ण सक्षमतेने सुरू करून शेतकऱ्यांना पाण्याची आवर्तने ठरवून दिली पाहिजेत.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ज्यांनी आर. आर. पाटील, जयंतराव यांच्याकडून कामे करून घेतली, आता ते इथं नाहीत. निवडणुकीत हार-जीत होत असते. टेंभू योजनेच्या पाण्यासाठी ५७ लाख ५७ हजार भरले. पण ६० दिवस पाणी दिले नाही. जेवढे पैसे भरले तेवढेही पाणी दिले नाही. आमदार बाबर यांचे नाव न घेता ते म्हणाले, तुमची काय ताकद आहे ती बघितली. आता पुन्हा पुढच्यावेळी पाणी सोडताना अडवून दाखवा. जयंतराव, आमच्या पाठीशी राहा. त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय रहात नाही. आॅगस्टमध्ये सगळे तलाव भरण्यासाठी आपल्याला आंदोलन करावे लागेल. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, पाटबंधारे विभागाचे अभियंता आर. एस. पवार हे काम कमी आणि राजकारण जास्त करत आहेत. आता यापुढे तक्रारी सांगण्यापेक्षा ते कार्यालयात असले तर बाहेर आणि बाहेर असले तर कार्यालयात त्यांना जाऊ देणार नाही. संघर्ष करू, तीव्र आंदोलने करू, याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही.यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश देशमुख, महिला आघाडीप्रमुख सौ. सुमन नागणे, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. सुमन देशमुख, उपसभापती भागवत माळी, जयंत नेवासकर, विठ्ठल पुकळे, राजू विभूते, श्रीरंग कदम यांची भाषणे झाली. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह देशमुख, हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती सौ. विद्या देशपांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती सौ. सुमन मोटे, पंचायत समिती सदस्या सौ. सुनीता गायकवाड, बळी मोरे, आटपाडीच्या सरपंच सौ. स्वाती सागर यांच्यासह मोठया संख्र्येन कार्यकर्ते , नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)नगरपालिकेला आमदारांचा खोडा!आटपाडी नगरपालिकेचा निर्णय शासनाने अद्याप प्रलंबित ठेवला आहे. यावर राजेंद्रअण्णा देशमुख यांनी आ. बाबर यांचे नाव न घेता नुसता विधानसभेत प्रश्न विचारला म्हणजे काम संपते का? पुढे काय झाले? आटपाडीत नगरपंचायत झाली, तर काय फरक पडतो, पण त्यांचा नगरपालिका करण्यासाठी जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला उमेदवार मिळणार नाही म्हणून ही धडपड आहे, असा आरोप केला. युवक राष्ट्रवादीचे ऋषिकेश देशमुख आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनीही असा आरोप केला.