शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यानंतर पुन्हा शेतकºयांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

शुक्रवार, दि. ७ जूनपासून संख येथून तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायथळ कालव्यापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाºया व्हसपेठ तलावात कालव्याद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बुद्रुक, लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कालव्याचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगाव या गावांना होईल. तेथेपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देवनाळ-मेंढेगिरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर, शेड्याळ ओढापात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढापात्रातून दरीकोणूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल. लमाणतांडा, पांढरेवाडी, खंडनाळपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर, जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी, आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ उपस्थित होते.पूर्व भागात का नाही?तुकाराम महाराज म्हणाले, कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत पाणी आल्यास आसंगी-तुर्क, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकोंडी या गावांना पाणी जाऊ शकते. जतमधून म्हैसाळचे पाणी जर सांगोला व मंगळवेढ्यास जाऊ शकते, तर जत पूर्व भागात का मिळत नाही? 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकcollectorजिल्हाधिकारी