शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यानंतर पुन्हा शेतकºयांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

शुक्रवार, दि. ७ जूनपासून संख येथून तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायथळ कालव्यापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाºया व्हसपेठ तलावात कालव्याद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बुद्रुक, लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कालव्याचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगाव या गावांना होईल. तेथेपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देवनाळ-मेंढेगिरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर, शेड्याळ ओढापात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढापात्रातून दरीकोणूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल. लमाणतांडा, पांढरेवाडी, खंडनाळपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर, जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी, आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ उपस्थित होते.पूर्व भागात का नाही?तुकाराम महाराज म्हणाले, कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत पाणी आल्यास आसंगी-तुर्क, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकोंडी या गावांना पाणी जाऊ शकते. जतमधून म्हैसाळचे पाणी जर सांगोला व मंगळवेढ्यास जाऊ शकते, तर जत पूर्व भागात का मिळत नाही? 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकcollectorजिल्हाधिकारी