शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

संख ते मुंबई पायी दिंडीचे सांगलीत आगमन -म्हैसाळ योजनेच्या पाण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सहभागी

सांगली : म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेत निवेदन सादर केले. त्यानंतर पुन्हा शेतकºयांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले.

शुक्रवार, दि. ७ जूनपासून संख येथून तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. सोमवारी सकाळी सांगलीत या दिंडीचे आगमन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिंडी आल्यानंतर शेतकºयांनी तुकारामबाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मायथळ कालव्यापासून फक्त दोन किलोमीटरवर असणाºया व्हसपेठ तलावात कालव्याद्वारे पाणी सोडल्यास माडग्याळ, सोन्याळ, कुलाळवाडी, राजोबावाडी, अंकलगी, उटगी, कारंडेवाडी, निगडी बुद्रुक, लमाणतांडा, उमदी या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. व्हसपेठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कालव्याचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी (जत), गोंधळेवाडी, संख, भिवर्गी, बेळोंडगी, करजगी, बोरगी, हळ्ळी, बालगाव या गावांना होईल. तेथेपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देवनाळ-मेंढेगिरी ओढापात्रातून पाणी सोडल्यास ते पाच्छापूर, शेड्याळ ओढापात्रापर्यंत येईल व शेड्याळ ओढापात्रातून दरीकोणूर, दरीबडची तलावात पाणी पोहोचेल. लमाणतांडा, पांढरेवाडी, खंडनाळपर्यंत ओढापात्रातून पाणी जाऊन या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

यावेळी विक्रम ढोणे, लक्ष्मण जबगोंड, कामाणा बंडगर, जेटलिंग कोरे, लिंबाजी माळी, आमाना पाटील, बसप्पा माळी, दशरथ सुतार, अमृत पाटील, संजय धुमाळ उपस्थित होते.पूर्व भागात का नाही?तुकाराम महाराज म्हणाले, कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत पाणी आल्यास आसंगी-तुर्क, मोठेवाडी, कागनरी, पांडोझरी, पारधी तांडा, करेवाडी, तिकोंडी या गावांना पाणी जाऊ शकते. जतमधून म्हैसाळचे पाणी जर सांगोला व मंगळवेढ्यास जाऊ शकते, तर जत पूर्व भागात का मिळत नाही? 

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूकcollectorजिल्हाधिकारी