शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

स्वातंत्र्यलढ्यात वाळवा तालुक्यातच सशस्र उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षणसंस्था सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, ...

हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षणसंस्था सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डाॅ. बाबूराव गुरव, हुतात्माचे वैभव नायकवडी, हुतात्मा साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : भारतात सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सशस्र उठाव वाळवा तालुक्यात झाला. १९४२चा क्रांती लढा हा एक वेगळाच आंदोलनाचा भाग होता, असे प्रतिपादन प्राचार्य आर.एस. चोपडे यांनी केले.

वाळवा येथे हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूह, शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, धरणग्रस्त व पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने आयोजित हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृती सभा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, बाबूराव बोरगावकर उपस्थित होते.

चोपडे म्हणाले, हुतात्मा म्हटले की, माणसाच्या मनात चैतन्य निर्माण व्हायचे असाच तो काळ होता. डाॅ. नागनाथ अण्णांच्यात कृतज्ञता ठासून भरली होती. त्यामुळेच त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालय, साखर कारखाना, हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय ही जिवंत स्मारके उभी केली आहेत. नागनाथ अण्णांच्या निस्पृहपणामुळे हुतात्म्याचे नाव संपूर्ण भारतभर होत आहे.

बाबूराव गुरव म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी कामगारांसाठी चार कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांना १२ ते १५ तास काम करावे लागणार आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या कल्याणाचे आहेत. हे तीन कृषी कायदे हानून नाही पाडले तर पाच वर्षांनी उसाला दर एफआरपीप्रमाणे मिळणार नाही.

वैभव नायकवडी यांचे भाषण झाले. शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी हुतात्मा किसन अहिर, हुतात्मा नानकसिंग व डाॅ.नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सागर चिखले यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य डाॅ. सुषमा नायकवडी, मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, मुख्याध्यापिका व्ही.के. चेंडके, मुख्याध्यापक बाळासाहेब नायकवडी, महादेव कांबळे, पोपट फाटक, अभियंता व्ही.डी. वाजे, बाळासाहेब पाटील, भगवान पाटील, दिनकर बाबर, यशवंत बाबर, धीरजकुमार माने उपस्थित होते.