शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यलढ्यात वाळवा तालुक्यातच सशस्र उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST

हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षणसंस्था सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, ...

हुतात्मा किसन अहिर व नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलताना महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षणसंस्था सांगलीचे अध्यक्ष प्राचार्य आर.एस. चोपडे, व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत प्रा.डाॅ. बाबूराव गुरव, हुतात्माचे वैभव नायकवडी, हुतात्मा साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : भारतात सुभाषचंद्र बोस यांच्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात सशस्र उठाव वाळवा तालुक्यात झाला. १९४२चा क्रांती लढा हा एक वेगळाच आंदोलनाचा भाग होता, असे प्रतिपादन प्राचार्य आर.एस. चोपडे यांनी केले.

वाळवा येथे हुतात्मा शिक्षण व उद्योगसमूह, शेतमजूर, कष्टकरी शेतकरी संघटना, धरणग्रस्त व पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने आयोजित हुतात्मा किसन अहिर व हुतात्मा नानकसिंग यांच्या ७५व्या स्मृती सभा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वैभव नायकवडी होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डाॅ. बाबूराव गुरव, बाबूराव बोरगावकर उपस्थित होते.

चोपडे म्हणाले, हुतात्मा म्हटले की, माणसाच्या मनात चैतन्य निर्माण व्हायचे असाच तो काळ होता. डाॅ. नागनाथ अण्णांच्यात कृतज्ञता ठासून भरली होती. त्यामुळेच त्यांनी हुतात्मा किसन अहिर विद्यालय, साखर कारखाना, हुतात्मा नानकसिंग विद्यालय सोनवडे, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय ही जिवंत स्मारके उभी केली आहेत. नागनाथ अण्णांच्या निस्पृहपणामुळे हुतात्म्याचे नाव संपूर्ण भारतभर होत आहे.

बाबूराव गुरव म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी कामगारांसाठी चार कायदे आणले आहेत. यामुळे कामगारांना १२ ते १५ तास काम करावे लागणार आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून भांडवलदारांच्या कल्याणाचे आहेत. हे तीन कृषी कायदे हानून नाही पाडले तर पाच वर्षांनी उसाला दर एफआरपीप्रमाणे मिळणार नाही.

वैभव नायकवडी यांचे भाषण झाले. शिराळा पंचायत समितीचे उपसभापती प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी हुतात्मा किसन अहिर, हुतात्मा नानकसिंग व डाॅ.नागनाथ अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सागर चिखले यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य डाॅ. सुषमा नायकवडी, मुख्याध्यापक मधुकर वायदंडे, मुख्याध्यापिका व्ही.के. चेंडके, मुख्याध्यापक बाळासाहेब नायकवडी, महादेव कांबळे, पोपट फाटक, अभियंता व्ही.डी. वाजे, बाळासाहेब पाटील, भगवान पाटील, दिनकर बाबर, यशवंत बाबर, धीरजकुमार माने उपस्थित होते.