शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दोषारोपपत्रातील बदलासाठी उज्वल निकम यांचा युक्तीवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 11:30 IST

बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरुन झालेल्या खून खटल्यात दोषारोपपत्रात बदल करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला असून, यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांचा युक्तीवाद होणार आहे.

ठळक मुद्देपळशी येथील तीन महिलांचा गळा चिरुन झालेल्या खून खटल्यात युक्तीवाद २४ रोजी पुढील सुनावणीतिघांविरुद्ध खून केल्याचा आरोप काकतकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु

सांगली : बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिच्या पळशी (ता. खानापूर) येथील सासरकडील तीन महिलांचा गळा चिरुन झालेल्या खून खटल्यात दोषारोपपत्रात बदल करण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी युक्तीवाद केला. पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला असून, यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांचा युक्तीवाद होणार आहे.

सुधीर सदाशिव घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) व एक अल्पवयीन अशा तिघांविरुद्ध तीन महिलांचा खून केल्याचा आरोप आहे. संशयित सुधीर घोरपडे याची बहिण विद्याराणी हिचा विवाह पळशीतील बाळासाहेब शिंदे यांचा मुलगा बळवंतशी झाला होता. कौटूंबिक कलहातून २००९ मध्ये विद्याराणीने आत्महत्या केली होती. तिला आत्महत्येस सासरे बाळासाहेब शिंदे व घरातील अन्य लोकांनी प्रवृत्त केल्याचा संशय सुधीरला होता.

या घटनेपासून तो शिंदे कुटूंबावर चिडून होता. यातून त्याने मित्रांच्या मदतीने २१ जून २०१५ रोजी पळशीतील शिंदे वस्तीवर जाऊन ब्रम्हदेव शिंदे यांची आई प्रभावती शिंदे, बहिन सुनीता संजय पाटील व पत्नी निशीगंधा शिंदे यांच्या चाकूने गळा चिरुन खून केला होता.

गेल्या महिन्यापासून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्या न्यायालयात या तिहेरी खून खटल्याची सुनावणी सुरु झाली आहे. सरकार पक्षातर्फे या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम या खटल्याचे काम पाहत आहेत.

बचाव पक्षातर्फे सांगलीतील अ‍ॅड. प्रमोद सुतार काम पाहत आहेत. गत सुनावणीला अ‍ॅड. निकम यांनी दोषारोपपत्रामध्ये बदल करणार असल्याने सांगून तसा अर्जही सादर केला. त्यावर मंगळवारी १० आॅक्टोंबरला न्यायालयाने सुनावणी सुरु ठेवली.कट रचून खूनअ‍ॅड. निकम यांनी दोषारोपपत्रात बदलासाठी मंगळवारी युक्तीवाद केला. यामध्ये त्यांनी संशयितांनी कट रचून खून केला आहे, हे कलम वाढविण्यात यावे, अशी मागणी केली. दहा मिनीटे त्यांचा युक्तीवाद झाला. आता पुढील सुनावणी २४ आॅक्टोंबरला आहे. यादिवशी बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय दोषारोपपत्रात बदल करण्याबाबत निर्णय देणार आहे.