शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगररचनेतील अधिकाऱ्यांना चाप

By admin | Updated: January 15, 2015 23:21 IST

उपायुक्त रसाळ यांचे आदेश : अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित

सांगली : शहरातील अनधिकृत बांधकाम, प्लॉटवर कारवाईबाबत नेहमीच हात झटकणाऱ्या पालिकेच्या नगररचना विभागाला उपायुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या निर्णयाने झटका बसला आहे. अनधिकृत बांधकामाला खतपाणी घालणाऱ्या नगररचनेला चाप लावत त्याची जबाबदारी या विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. अशी बांधकामे रोखण्यापासून पाडण्यापर्यंतची सारी कारवाई नगररचना विभागाला पार पाडावी लागणार आहे. तसे आदेश आयुक्त अजिज कारचे यांनी नुकतेच नगररचना विभागाला देत सहायक आयुक्त, प्रभाग अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. शहरातील अनधिकृत बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला आहे. बिल्डरांनी परवानगीपेक्षा जादा बांधकामे करून स्वत:ची तुंबडी भरली आहे. गुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंग करून नागरिकांची फसवणूक झाली आहे. तरीही पालिकेने गांधारीची भूमिका घेत नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहे; पण त्यानंतर संबंधिताने नियमानुसार बांधकाम केले की नाही, पार्किंग, तळघराचा विनापरवाना वापर, परवानगीविना जमिनीवर भराव घालणे अथवा खुदाई करणे, परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन, आरक्षित जागांवर बांधकामे, असे कोणत्याच बाबीची जबाबदारी नगररचना विभाग घेत नसे. अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाले तर, अतिक्रमण विभागाकडे बोट दाखविले जाईल. त्यात असे अतिक्रमण काढण्यात अनेक अडचणी येत असे. नगररचना विभागाने परवानगी दिल्याने बेकायदा बांधकाम करणाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा होतो आणि त्यातून पुन्हा पालिकेवर ताशेरे ओढले जातात. या साऱ्या प्रकाराला चाप लावण्यासाठी उपायुक्त प्रशांत रसाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांनी या साऱ्या बाबींची माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली. वास्तविक अनधिकृत बांधकामे रोखण्याची जबाबदारी नगररचनाकार व त्यांच्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर आहे. आता आयुक्त अजिज कारचे यांनी तसा आदेशच काढत जबाबदारी निश्चित केली आहे. सांगली व मिरजेतील नगररचनाकारांना यापुढे अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास तातडीने पंचनामा करून त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांना कलम ५२, ५३ च्या नोटिसा देण्याचे अधिकारही नगररचनाकाराकडेच असतील. तसेच संबंधित बांधकाम पाडण्याची कार्यवाहीचा अहवाल सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकाऱ्यांना सादर करणेही बंधनकारक केले आहे. इमारत पाडण्याची जबाबदारी नगरअभियंत्यांमार्फत होणार असली, तरी त्याठिकाणी सहायक आयुक्त, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कनिष्ठ अभियंते, आरेखक, अनुरेखक यांना घटनास्थळी उपस्थित राहावे लागणार आहे. आयुक्तांच्या या नव्या आदेशामुळे नगररचनातील गैरकारभाराला आळा बसणार आहे.तसेच केवळ बांधकाम परवाना देऊन नामानिराळे होणाऱ्या नगररचना विभागाला आता जबाबदारीची भूमिका घ्यावी लागेल. अन्यथा या विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. (प्रतिनिधी)गुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंगगुंठेवारी भागात अनधिकृत प्लॉटिंग करून नागरिकांची फसवणूक झाली आहे. तरीही पालिकेने गांधारीची भूमिका घेत नागरिकांना वाऱ्यावर सोडले होते. बांधकाम परवाना देण्याचे अधिकार नगररचना विभागाला आहेत; पण त्यानंतर परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन, आरक्षित जागांवर बांधकामे, अशा कोणत्याच बाबीची जबाबदारी नगररचना विभाग घेत नसे. नवीन तरतुदीनुसार नगररचना विभागावर जबाबदारी निश्चित केली आहे.