शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘कास’ची उंची वाढविण्यास मंजुरी

By admin | Updated: August 28, 2014 23:03 IST

पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात : भोपाळ कार्यालयाचा हिरवा कंदील

सातारा : शहरासह ११ गावांच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या कास तलावाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे. वनखात्याची २.६७ हेक्टर इतकी जमीन संपादित करण्यासाठी वनखात्याच्या भोपाळ येथील केंद्रीय कार्यालयाने तत्त्वत: मंजुरी दिली असून, पावसाळ्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे संकेत पालिकेने दिले आहेत.कास तलाव सध्या ०.१ टीएमसी आहे. डोंगरांच्या कुशीत असणाऱ्या कास तलावातून सातारा शहरासह ११ गावांना पाणीपुरवठा केला जातो. तो सातारा पालिकेच्या मालकीचा आहे. त्याची उंची वाढवून पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी सातारा पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. राज्य शासनाच्या सुजल निर्मल जल योजनेतून ४५ कोटींचा निधी या कामासाठी मंजूर झाला आहे. यापैकी ८० टक्के रक्कम राज्य शासन देणार असून, उर्वरित २० टक्के रकमेचा निधी सातारा पालिकेला गुंतवायचा आहे. उंची वाढविल्यानंतर कास तलावाची क्षमता एक टीएमसी होणार असून, शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा दूर होणार आहे. पालिकेला संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीची रक्कम व वृक्षतोडीचा निधी वनखात्याकडे सुपूर्द करावा लागणार आहे. त्याबाबतच्या सूचना येत्या पंधरा दिवसांत पालिकेला मिळणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)