शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

खानापूरजवळ टेंभूचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:48 PM

पांडुरंग डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क खानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर ...

पांडुरंग डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखानापूर : तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णामाई’ खानापूर घाटमाथ्यावर अवतरली आणि संपूर्ण घाटमाथ्यावर उत्साही व आनंदी वातावरण पसरले. गेल्या पाच वर्षांपासून घाटमाथ्यावरील सर्वच गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत असताना ‘कृष्णामाई’चे झालेले आगमन घाटमाथ्यावरील ‘दुष्काळ’ कायमचा संपविणार असल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.खानापूर घाटमाथ्यावर टेंभू योजनेच्या भूड येथील पाचवा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कृष्णेचे पाणी येणार होते. त्यामुळे पाचव्या टप्प्याकडे संपूर्ण खानापूर पूर्व भागाचे लक्ष लागून राहिले होते. १९९७ मध्ये स्थापन झालेल्या टेंभू योजनेच्या भूड येथील पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होण्यास २०१९ उजाडले. पाचव्या टप्प्याचे काम पूर्ण होणार का? घाटमाथ्यावर पाणी येणार का? अशी साशंकता व्यक्त होत होती. मात्र पाचव्या टप्प्याच्या कामास गेल्या सात-आठ महिन्यांपासून गती आली आणि प्रत्यक्ष पाचव्या टप्प्यावर कार्यरत यंत्रणेच्या अथक् प्रयत्नाने पाचवा टप्पा पूर्ण होऊन यशस्वी झाला.गेली पाच वर्षे खानापूर घाटमाथा भीषण दुष्काळास तोंड देत आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शेती व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्व स्रोत आटल्याने अत्यंत गंभीर बनला आहे. तलाव, विहिरींबरोबर कूपनलिकांचे पाणी संपल्याने सर्व गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकर भरण्यासाठी जवळपास पाणी नाही. यामुळे खानापूर घाटमाथा टेंभूच्या पाण्याकडे डोळे लावून बसला होता. पाचवा टप्पा जिव्हाळ्याचा व जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.गेल्या आठवड्यापासून पाचवा टप्पा आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, अशा बातम्यांमुळे लोकांत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मागील दोन दिवसांत दोनवेळा पाचवा टप्पा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. परंतु काही अडचणींमुळे यशस्वी झाला नाही. अखेर रविवारी सकाळी भूडच्या पाचव्या टप्प्याची एक मोटर सुरू झाली.बलवडी (खा.) च्या मुख्य टाकीत पाणी आले, अशी बातमी घाटमाथ्यावर पसरली आणि लोकांनी बलवडी (खा.)कडे धाव घेतली. वाहते पाणी पाहून लोकांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला.