शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:49 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला.

श्रीनिवास नागेसांगली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला. जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

महाराष्ट्रातील साताऱ्यात झाली स्थापना

'चले जाव' चळवळीत बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंहांनी ऑगस्ट १९४२ मध्ये प्रतिसरकार स्थापन केले. प्रशासनाचे कार्य भूमिगत क्रांतिकारकांनी हाती घेतले.

४ वर्षे चाललेले सरकारमहाराष्ट्रातील भूमिगतांनी सुनियोजित पद्धतीने चार वर्षे प्रतिसरकार चालवले, इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन-शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत.

लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रमप्रतिसरकारने औध संस्थानची पुरोगामी राज्यघटना थोड्याफार फरकाने स्वीकारून त्यानुसार कारभार चालवला. प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. शिवाय सात ते तेरा गावांची गट समिती आणि त्यावर नियंत्रणासाठी मध्यवर्ती समिती होती. लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रम जाहीर केला.

काय होता 'तो' कार्यक्रम

  • दरोडेखोर, गावगुंडांच्या बंदोबस्तासह सावकारी नियंत्रण कायदा व जमिनीचे फेरवाटप केले. दारुबंदी करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्त्रियांना मानसन्मान देत विवाहितांचा छळ थांबवला. अंधश्रद्धा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला.
  • स्वतंत्र न्यायदान मंडळे स्थापन करून मोफत आणि त्वरित न्याय देण्याची व्यवस्था केली. चार वर्षांत प्रतिसरकारने ५० हजार खटल्यांचे निकाल देऊन ३४ कोटी रुपयांचा न्यायालयांचा खर्च वाचविला. अत्यंत कमी खर्चात लग्न करण्याची प्रथा सुरू केली. सार्वजनिक वाचनालये उघडली. साक्षरता वर्ग सुरु केले. 

दीड हजार गावे आणि तुफान सेना

सुमारे दीड हजार गावांत प्रतिसरकारचा कारभार सुरू होता. न्यायदान, लोकांचे संरक्षण आणि ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी 'तुफान सेनेची स्थापना करण्यात आली. या दलात पाच हजार तरुण सहभागी झाले, त्यांना हत्यारे चालवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

प्रतिसरकार'चे झाले 'पत्री सरकार'गुन्हेगारांवर, क्रांतिकारकांबद्दल चुगल्या करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून शिक्षा देण्यात येऊ लागली. त्याचे पाय बांधून तळपायावर काठ्यांनी बडवले जायचे, त्यालाच 'पत्री मारणे' म्हटले जायचे. त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्रतिसरकार'चे 'पत्री सरकार' झाले.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन