शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: 'प्रतिसरकार' बनले होते स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणा स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:49 IST

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला.

श्रीनिवास नागेसांगली : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी १९४२ रोजी स्थापन केलेल्या प्रतिसरकारने ब्रिटिश सरकारला हादरे देत, त्यांची शासन व्यवस्था नाकारून लोकाभिमुख कारभार केला. जनतेत विश्वास निर्माण झाल्यामुळे प्रतिसरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले.

महाराष्ट्रातील साताऱ्यात झाली स्थापना

'चले जाव' चळवळीत बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन झाली. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंहांनी ऑगस्ट १९४२ मध्ये प्रतिसरकार स्थापन केले. प्रशासनाचे कार्य भूमिगत क्रांतिकारकांनी हाती घेतले.

४ वर्षे चाललेले सरकारमहाराष्ट्रातील भूमिगतांनी सुनियोजित पद्धतीने चार वर्षे प्रतिसरकार चालवले, इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन-शिक्षा करणे यासारखी कामे प्रतिसरकारमार्फत केली जात असत.

लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रमप्रतिसरकारने औध संस्थानची पुरोगामी राज्यघटना थोड्याफार फरकाने स्वीकारून त्यानुसार कारभार चालवला. प्रत्येक गावात ग्रामसमिती स्थापन करण्यात आली. शिवाय सात ते तेरा गावांची गट समिती आणि त्यावर नियंत्रणासाठी मध्यवर्ती समिती होती. लोकहितासाठी चौदा कलमी कार्यक्रम जाहीर केला.

काय होता 'तो' कार्यक्रम

  • दरोडेखोर, गावगुंडांच्या बंदोबस्तासह सावकारी नियंत्रण कायदा व जमिनीचे फेरवाटप केले. दारुबंदी करून हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. स्त्रियांना मानसन्मान देत विवाहितांचा छळ थांबवला. अंधश्रद्धा, अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला.
  • स्वतंत्र न्यायदान मंडळे स्थापन करून मोफत आणि त्वरित न्याय देण्याची व्यवस्था केली. चार वर्षांत प्रतिसरकारने ५० हजार खटल्यांचे निकाल देऊन ३४ कोटी रुपयांचा न्यायालयांचा खर्च वाचविला. अत्यंत कमी खर्चात लग्न करण्याची प्रथा सुरू केली. सार्वजनिक वाचनालये उघडली. साक्षरता वर्ग सुरु केले. 

दीड हजार गावे आणि तुफान सेना

सुमारे दीड हजार गावांत प्रतिसरकारचा कारभार सुरू होता. न्यायदान, लोकांचे संरक्षण आणि ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी 'तुफान सेनेची स्थापना करण्यात आली. या दलात पाच हजार तरुण सहभागी झाले, त्यांना हत्यारे चालवण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले.

प्रतिसरकार'चे झाले 'पत्री सरकार'गुन्हेगारांवर, क्रांतिकारकांबद्दल चुगल्या करणाऱ्यांवर वचक बसावा म्हणून शिक्षा देण्यात येऊ लागली. त्याचे पाय बांधून तळपायावर काठ्यांनी बडवले जायचे, त्यालाच 'पत्री मारणे' म्हटले जायचे. त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन प्रतिसरकार'चे 'पत्री सरकार' झाले.

टॅग्स :SangliसांगलीIndependence Dayस्वातंत्र्य दिन