शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

इस्लामपूर आगारातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी-पाणी चांगले असल्याचा जबाब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:10 IST

इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.दरम्यान, पाणी चांगलेच आहे, टाकी वेळेवर स्वच्छ केली जाते, ...

ठळक मुद्देकाविळीने वाहकाचा मृत्यू प्रकरण; एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाºयांवर दबाव?

इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.दरम्यान, पाणी चांगलेच आहे, टाकी वेळेवर स्वच्छ केली जाते, असा जबाब द्या, असा दबाव इस्लामपूर आगार प्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी आणला. परंतु ‘लोकमत’ आपल्या पाठीशी असल्याने कर्मचाºयांनी याला पूर्णपणे विरोध केला.

या काविळीच्या प्रकरणाचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाºयांनी याची चांगलीच दखल घेतली. सोमवारी सकाळी बांधकाम विभागाचे अधिकारी लालासाहेब कळसे यांनी भेट देऊन टाकी आणि परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी स्वच्छता ठेकेदार प्रशांत परीट यांना बोलावून सर्व स्वच्छता करुन घेण्याचे आदेश दिले.

प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्थाही अत्यंत गंभीर आहे. ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. तसेच अनेक वर्षांपासून या विहिरीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पाणी पिऊन अनेक प्रवाशांना त्रास होत आहे. या पाण्याच्या टाकीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्षच केले आहे.दरम्यान, २२ मार्च रोजी सांगलीतील अधिकारी व इस्लामपूर येथील एसटी कर्मचाºयांमध्ये बैठक झाली होती. यावेळी कर्मचाºयांनी अशुध्द पाण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आगारप्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी त्याची दखल घेतली नाही. यामुळेच विजय मिरजकर यांना आपला प्राण गमवावा लागला. एवढे होऊनही त्यांच्यावर कसलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही.महामंडळाकडूनही त्यांना कसलीही मदत अथवा सहानुभूती दाखविण्यात आलेली नाही. एका कर्मचाºयाचा बळी देऊनही प्रशासन काहीच हालचाल करीत नसल्याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.इस्लामपूरचं पाणी लय चांगलं!इस्लामपूर शहराला ट्रिपल फिल्टर (शुध्द) पाण्याचा पुरवठा केला जातो. हेच पाणी एसटी आगारालाही पुरविले जाते. यामुळेच आष्टा, शिराळा, तासगाव व बाहेरील आगारांचे कर्मचारी आपल्याकडील मोकळ्या बाटल्या इस्लामपूर येथील पाण्याच्या टाकीतून भरुन घेऊन जात होते. परंतु येथील टाक्यांची स्वच्छताच होत नसल्याने पाणी अस्वच्छ बनले होते. यामुळेच हा काविळीचा त्रास कर्मचाºयांना झाला आहे.नमुन्यासाठी पाणी पाठवले वेगळेवाहक विजय वसंतराव मिरजकर यांचा अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजताच इस्लामपूर आगारातील कर्मचाºयांनी रविवारी टाकीतील सर्व पाणी सोडून दिले होते. मग सोमवारी तपासणीसाठी घेतलेले पाण्याचे नमुने कोणते घेतले? हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक