शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर आगारातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी-पाणी चांगले असल्याचा जबाब द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:10 IST

इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.दरम्यान, पाणी चांगलेच आहे, टाकी वेळेवर स्वच्छ केली जाते, ...

ठळक मुद्देकाविळीने वाहकाचा मृत्यू प्रकरण; एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाºयांवर दबाव?

इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºयांनी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.दरम्यान, पाणी चांगलेच आहे, टाकी वेळेवर स्वच्छ केली जाते, असा जबाब द्या, असा दबाव इस्लामपूर आगार प्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी आणला. परंतु ‘लोकमत’ आपल्या पाठीशी असल्याने कर्मचाºयांनी याला पूर्णपणे विरोध केला.

या काविळीच्या प्रकरणाचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच इस्लामपूरसह सांगली जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाºयांनी याची चांगलीच दखल घेतली. सोमवारी सकाळी बांधकाम विभागाचे अधिकारी लालासाहेब कळसे यांनी भेट देऊन टाकी आणि परिसराची पाहणी केली. यानंतर त्यांनी स्वच्छता ठेकेदार प्रशांत परीट यांना बोलावून सर्व स्वच्छता करुन घेण्याचे आदेश दिले.

प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची अवस्थाही अत्यंत गंभीर आहे. ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. तसेच अनेक वर्षांपासून या विहिरीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे पाणी पिऊन अनेक प्रवाशांना त्रास होत आहे. या पाण्याच्या टाकीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्षच केले आहे.दरम्यान, २२ मार्च रोजी सांगलीतील अधिकारी व इस्लामपूर येथील एसटी कर्मचाºयांमध्ये बैठक झाली होती. यावेळी कर्मचाºयांनी अशुध्द पाण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आगारप्रमुख शर्मिष्ठा घोलप—पाटील यांनी त्याची दखल घेतली नाही. यामुळेच विजय मिरजकर यांना आपला प्राण गमवावा लागला. एवढे होऊनही त्यांच्यावर कसलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही.महामंडळाकडूनही त्यांना कसलीही मदत अथवा सहानुभूती दाखविण्यात आलेली नाही. एका कर्मचाºयाचा बळी देऊनही प्रशासन काहीच हालचाल करीत नसल्याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.इस्लामपूरचं पाणी लय चांगलं!इस्लामपूर शहराला ट्रिपल फिल्टर (शुध्द) पाण्याचा पुरवठा केला जातो. हेच पाणी एसटी आगारालाही पुरविले जाते. यामुळेच आष्टा, शिराळा, तासगाव व बाहेरील आगारांचे कर्मचारी आपल्याकडील मोकळ्या बाटल्या इस्लामपूर येथील पाण्याच्या टाकीतून भरुन घेऊन जात होते. परंतु येथील टाक्यांची स्वच्छताच होत नसल्याने पाणी अस्वच्छ बनले होते. यामुळेच हा काविळीचा त्रास कर्मचाºयांना झाला आहे.नमुन्यासाठी पाणी पाठवले वेगळेवाहक विजय वसंतराव मिरजकर यांचा अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजताच इस्लामपूर आगारातील कर्मचाºयांनी रविवारी टाकीतील सर्व पाणी सोडून दिले होते. मग सोमवारी तपासणीसाठी घेतलेले पाण्याचे नमुने कोणते घेतले? हा संशोधनाचा विषय आहे.

टॅग्स :Sangliसांगलीwater transportजलवाहतूक