शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

सुदानमध्ये अडकलेले सांगली जिल्ह्यातील आणखी ३० जण भारतात परतले

By शरद जाधव | Updated: May 5, 2023 19:54 IST

सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

शरद जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क सांगली: आफ्रिका खंडातील सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकून पडलेल्या जिल्ह्यातील आणखी ३० नागरिक भारतात परतले. दोनच दिवसांपूर्वी सातजण परतले होते. केंद्र सरकारच्या 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील नागरिक सुखरूपपणे परतले आहेत.

सांगली जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत. सुदानमध्ये विविध कारखान्यात कामासाठी जिल्ह्यातील १०० ते १२० नागरिक होते. गृहयुध्द सुरूच असल्याने या कामगारांनी भारतात परतण्याची मागणी केली होती. त्यानुसार केनाना शुगर फॅक्टरीत कामास असलेले कामगार आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतवासासोबत चर्चा केली होती. त्यानुसार केनाना मध्ये अडकलेल्या कामगारांना पोर्ट सुदानपर्यंत आणण्यासाठी सोय करण्यात आली. यानंतर रविवारी सातजण परतले होते. आता आणखी ३० जण परतल्याने नागरिकांनी शासनाचे आभार मानले. तिथे अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली होती.

टॅग्स :Sangliसांगली