शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

प्रबाेधनकारांच्या यादीत अण्णा भाऊ साठेंचा समावेश नाही, वाटेगावात बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 14:56 IST

वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ ...

वाटेगाव : केंद्र सरकारने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा समावेश प्रबोधनकारांच्या यादीत न केल्याने अण्णा भाऊंच्या मूळ गावात वाटेगाव (ता. वाळवा) येथे काल, बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोनाचे सर्व नियम पाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे राज्य अध्यक्ष सुधाकर भालेराव यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा केंद्रस्तरीय प्रबाेधनकारांच्या यादीत समावेश करण्याची मागणी केली हाेती. यावर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे सचिव विकास त्रिवेदी यांनी पत्र पाठवून अण्णा भाऊंचे नाव या यादीत समाविष्ट करण्यात येत नसल्याचे भालेराव यांना कळवले आहे. याची माहिती मिळाल्यानंतर वाटेगाव येथे अण्णा भाऊंच्या स्मारकासमोर निषेध करण्यात आला. बुधवारी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, फकिरा साठे, विनोद जाधव यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी प्रतिभा ऐतवडेकर, जनार्दन साठे, आण्णा खोत, संदीप साठे, योगेश साठे, किरण साठे, सतीश साठे, दिनेश जाधव उपस्थित होते.

सायंकाळी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी सूरज साठे, योगेश साठे, आशिष जाधव यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. गावात दिवसभर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :SangliसांगलीCentral Governmentकेंद्र सरकार