शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:37 IST

बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण ...

बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण करू नका, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.कोकरुड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील अध्यक्षस्थानी होते.अण्णा हजारे म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो व देश बदलायचा असेल तर भारतातील खेडी बदलली पाहिजेत. खेड्यांमध्ये इमारती बदलून चालणार नाहीत, तर मानस बदलायला शिकले पाहिजे. मात्र मानस बदलण्यासाठी जी उणीव आहे, ती भरून निघत नाही, तोपर्यंत देश बदलणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.नेता कसा असावा हे सांगताना ते म्हणाले, शुद्ध, आचार-विचार आणि निष्कलंकित नेता असावा. तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होईल. आचार-विचार नसलेल्या नेतृत्वाकडून कधीही देशाचा विकास, भले होऊ शकत नाही. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे तिला सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांच्यात देशसेवेचे संस्कार रुजविले पाहिजेत. ते म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांच्यासारखा नेता, आनंद पाटील, विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखे अधिकारी असतील, तर हा देश खूप पुढे जाईल.तामिळनाडू गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक आनंद पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. राजश्री आनंद पाटील यांची ईडीआयआयच्या (भारतीय उद्योजकता विकास संस्था) संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांना वारणा क्रांतिजोती पुरस्कार व आबा फौंडेशनच्यावतीने नारायण नांगरे आबा स्मृती वारणेचा वाघ कुस्ती पुरस्कार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांना, तसेच विकास नांगरे यांना वारणा कृषिरत्न पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, बाळासाहेब पाटील, अनिलराव देशमुख, बाजार समिती सभापती सुजित देशमुख, आबा फौंडेशनच्या अध्यक्षा रुपाली नांगरे-पाटील, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच नंदकुमार पाटील, श्रीरंग नांगरे, प्रा. ए. सी. पाटील, गजानन घोडे, सुनील पाटील, पोपट पाटील, सुहास पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते.याप्रसंगी सत्यम शिवम सुंदरम हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संपतराव देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक, तर बाबासाहेब परीट व संजय घोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा ए. सी. पाटील यांनी आभार मानले.