शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
3
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
5
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
6
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
7
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
8
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
9
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
10
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
11
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
12
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
13
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
14
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
15
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
16
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
17
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
18
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
19
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
20
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अण्णा म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:37 IST

बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण ...

बिळाशी : देशासाठी विकास व निसर्ग दोन्हीही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शाश्वत विकास करायचा असेल, तर निसर्गाचे शोषण करू नका, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.कोकरुड (ता. शिराळा) येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने आयोजित शिवाजीराव देशमुख व्याख्यानमालेत ते बोलत होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील अध्यक्षस्थानी होते.अण्णा हजारे म्हणाले, भाषणाला कृतीची जोड असेल तर देश बदलू शकतो व देश बदलायचा असेल तर भारतातील खेडी बदलली पाहिजेत. खेड्यांमध्ये इमारती बदलून चालणार नाहीत, तर मानस बदलायला शिकले पाहिजे. मात्र मानस बदलण्यासाठी जी उणीव आहे, ती भरून निघत नाही, तोपर्यंत देश बदलणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.नेता कसा असावा हे सांगताना ते म्हणाले, शुद्ध, आचार-विचार आणि निष्कलंकित नेता असावा. तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होईल. आचार-विचार नसलेल्या नेतृत्वाकडून कधीही देशाचा विकास, भले होऊ शकत नाही. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे तिला सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यांच्यात देशसेवेचे संस्कार रुजविले पाहिजेत. ते म्हणाले, शिवाजीराव देशमुख यांच्यासारखा नेता, आनंद पाटील, विश्वास नांगरे-पाटील यांच्यासारखे अधिकारी असतील, तर हा देश खूप पुढे जाईल.तामिळनाडू गृहनिर्माणचे व्यवस्थापकीय संचालक आनंद पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. राजश्री आनंद पाटील यांची ईडीआयआयच्या (भारतीय उद्योजकता विकास संस्था) संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांना वारणा क्रांतिजोती पुरस्कार व आबा फौंडेशनच्यावतीने नारायण नांगरे आबा स्मृती वारणेचा वाघ कुस्ती पुरस्कार महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांना, तसेच विकास नांगरे यांना वारणा कृषिरत्न पुरस्कार मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी फत्तेसिंगराव देशमुख, संपतराव देशमुख, बाळासाहेब पाटील, अनिलराव देशमुख, बाजार समिती सभापती सुजित देशमुख, आबा फौंडेशनच्या अध्यक्षा रुपाली नांगरे-पाटील, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच नंदकुमार पाटील, श्रीरंग नांगरे, प्रा. ए. सी. पाटील, गजानन घोडे, सुनील पाटील, पोपट पाटील, सुहास पाटील, मोहन पाटील, अंकुश नांगरे, रमेश पोतदार आदी उपस्थित होते.याप्रसंगी सत्यम शिवम सुंदरम हा भावगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. संपतराव देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक, तर बाबासाहेब परीट व संजय घोडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा ए. सी. पाटील यांनी आभार मानले.