शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अंजनीत नाही उभारली गुढी!

By admin | Updated: March 22, 2015 00:26 IST

गाव सुनेसुने : आर. आर. आबांच्या निधनाचे सावट कायम

तासगाव : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’ने आज (शनिवारी) आपल्या लाडक्या नेत्यावरील प्रेम दाखवून दिले. घरातील एखाद्याचे निधन झाल्यानंतर वर्षभर सणवार न करण्याची प्रथा आबांच्या निधनानंतर अख्ख्या अंजनीने पाळली असून, आज गुढीपाडव्याला गावात एकही गुढी उभारली गेली नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला आकस्मिक निधन झाल्याने अंजनी (ता. तासगाव) गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून हे गाव अजून सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आज आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. राजकारणाचा श्रीगणेशा झाल्यापासून अंजनीने पूर्ण ताकदीने आबांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली होती. गेल्या १५ वर्षात आबांच्या मंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत अंजनीचा रूबाब काही औरच होता. राज्यातील बड्या-बड्यांचा वावर, राज्यभरातील कार्यकर्त्यांची रीघ, पोलिसांचा ताफा, हेलिकॉप्टरच्या चकरा हे गावातील आठवडा-पंधरवड्याचे ठरलेले चित्र. परिसरातील एकमेव हेलिपॅड या गावातच तयार करण्यात आले होते. आबांच्या जडणघडणीत अंजनीचे योगदान आणि गावाचा लौकीक राज्यभरात वाढता ठेवण्यात आबांचे योगदान मोठे होते. आबांच्या अकाली निधनाची जखम ग्रामस्थांच्या काळजात घर करून राहिली आहे. त्यामुळेच आज गुढीपाडवा असला तरी गावावर आबांच्या निधनाचे सावट दिसत होते. गावातील वातावरण सुनेसुने होते. गावात एकही गुढी उभारली गेली नाही. गुढी उभी न करता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)