शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

अंजनीत नाही उभारली गुढी!

By admin | Updated: March 22, 2015 00:26 IST

गाव सुनेसुने : आर. आर. आबांच्या निधनाचे सावट कायम

तासगाव : ज्या गावाची ओळख आर. आर. पाटील तथा आबांमुळे राज्यभर झाली, त्या ‘अंजनी’ने आज (शनिवारी) आपल्या लाडक्या नेत्यावरील प्रेम दाखवून दिले. घरातील एखाद्याचे निधन झाल्यानंतर वर्षभर सणवार न करण्याची प्रथा आबांच्या निधनानंतर अख्ख्या अंजनीने पाळली असून, आज गुढीपाडव्याला गावात एकही गुढी उभारली गेली नाही. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारीला आकस्मिक निधन झाल्याने अंजनी (ता. तासगाव) गावावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यातून हे गाव अजून सावरलेले नाही. येथील घराघरात वर्षभरातील कार्यक्रमांचे नियोजन आबांना गृहीत धरूनच केले जायचे, आबाही प्रत्येक कुटुंबांत रमायचे, पण आज आबाच नाहीत, त्यामुळे वर्षभर सणवार, उत्सव, कार्यक्रम करायचे नाहीत, असे जणू गावाने ठरवूनच टाकले आहे. राजकारणाचा श्रीगणेशा झाल्यापासून अंजनीने पूर्ण ताकदीने आबांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतली होती. गेल्या १५ वर्षात आबांच्या मंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत अंजनीचा रूबाब काही औरच होता. राज्यातील बड्या-बड्यांचा वावर, राज्यभरातील कार्यकर्त्यांची रीघ, पोलिसांचा ताफा, हेलिकॉप्टरच्या चकरा हे गावातील आठवडा-पंधरवड्याचे ठरलेले चित्र. परिसरातील एकमेव हेलिपॅड या गावातच तयार करण्यात आले होते. आबांच्या जडणघडणीत अंजनीचे योगदान आणि गावाचा लौकीक राज्यभरात वाढता ठेवण्यात आबांचे योगदान मोठे होते. आबांच्या अकाली निधनाची जखम ग्रामस्थांच्या काळजात घर करून राहिली आहे. त्यामुळेच आज गुढीपाडवा असला तरी गावावर आबांच्या निधनाचे सावट दिसत होते. गावातील वातावरण सुनेसुने होते. गावात एकही गुढी उभारली गेली नाही. गुढी उभी न करता ग्रामस्थांनी आबांना आदरांजली वाहिली. (वार्ताहर)