शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:05 IST

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे.

ठळक मुद्देपोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे. देशातील ही पहिली घटना तीही सांगली शहरात घडली. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत, अशी कबुली राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी यांनी दिली.

निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. वरिष्ठ अधिकाºयांनी त्याला वेळीच रोखून कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती, असेही त्यांनी सांगितले.अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण व उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेण्यासाठी बिहारी शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाले होते.

शनिवारी सकाळी त्यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली. कोथळेचे नातेवाईक, साक्षीदार यांच्याशी संवाद साधला. सीआयडीचे अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा यांच्याशी तपासाबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बिहारी म्हणाले की, देशभरात आतापर्यंत पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत आरोपी मृत्यू झालेल्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सांगलीत घडलेल्या घटनेला पोलिसांनी वेगळेच वळण दिल्याने पोलिस दलाच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. अनिकेतकडून गुन्हा कबूल करुन घेण्यासाठी कामटेच्या पथकाने ‘थर्ड डिग्री’चा वापर केला. यात त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूनंतरही त्यांची क्रूरता वाढत गेली. मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेऊन जाळला.

पोलिसांचे हे कृत्य धक्कादायक आहे. आठ हजाराच्या चोरीच्या गुन्'ाचा तपास करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’चा वापर करण्याची काय गरज होती? आजही पोलिस दलात काही अधिकारी थर्ड डिग्रीचा वापर करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे.यंत्रणेत दोषबिहारी म्हणाले की, कामटेची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकाºयांनी या तक्रारींची दखल घेऊन कामटेवर कारवाई करायला हवी होती. त्याला वेळीच रोखले असते तर, अनिकेत कोथळे प्रकरण घडले नसते. यामागे पोलिस यंत्रणेतील दोष कारणीभूत आहेत.बदल केले पाहिजेतअनिकेत कोथळेच्या मृत्यू प्रकरणावेळी पोलिस ठाण्यातील सीसी टीव्ही कॅमेरे बंद होते. याबाबत बिहारी म्हणाले की, त्याबाबत तपास सुरू आहे. पोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. स्वत:मध्येही बदल केले पाहिजेत.पोलिस ठाण्याला भेटबिहारी यांनी शहर पोलिस ठाण्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे होते. ज्या ‘डी.बी.’च्या खोलीमध्ये अनिकेतचा खून झाला, त्याचीही पाहणी केली. अधिकारी व कर्मचाºयांशी संवाद साधला.

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे