शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रक्रिया उद्योगांच्या वाढीकडे नेहमीच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:32 IST

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ...

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणावे तेवढे प्रयत्न न केल्यामुळेच मोठे कृषी प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभे राहिले नाहीत. उद्योग भवनकडे मात्र जिल्ह्यात ३५०० कृषी प्रक्रिया उद्योग सुरू असल्याची नोंद आहे.उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांचे अनुदान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच लाटत आहेत.योजना चांगल्या असूनही लाभार्थींना अनुदानच वेळेवर मिळत नसल्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत अडचणी असल्याचे नवीन उद्योजकांनी सांगितले. उत्पादित मालास योग्य बाजारपेठही उपलब्ध नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. ते रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टची खा. संजयकाका पाटील यांनी घोषणा केली. पण, त्याची अंमलबजावणी झालीच नाही.2 सहकारी कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले. पण, ढिसाळ व्यवस्थापन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे ते उद्योग बंद पडले आहेत.3 कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होत आहेत. या नवीन उद्योजकांना मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळेही ते बंद पडत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग केंद्र आणि राज्य शासनाने स्वत: पुढाकार घेऊन वाढविण्याची गरज आहे. तरच शेतीचा विकास होण्यास मदत होईल.2कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी शासनाने वीज, जागा मोफत उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तरच हे उद्योग वाढतील आणि टिकतील सुध्दा.3अनुदान देऊन कृषी प्रक्रिया उद्योग वाढणार नाहीत, तर ते वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने किमान दहा वर्षाचे धोरण आखण्याची गरज आहे. करामध्ये सवलत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.