शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कृषी प्रक्रिया उद्योगांच्या वाढीकडे नेहमीच दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:32 IST

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ...

सांगली : द्राक्ष, डाळिंब, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादनासोबत मोठ्या प्रमाणावर होणारे कुक्कुटपालन ही सांगली जिल्ह्याची ओळख आहे. अन्नाची नासाडी टाळण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी म्हणावे तेवढे प्रयत्न न केल्यामुळेच मोठे कृषी प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात उभे राहिले नाहीत. उद्योग भवनकडे मात्र जिल्ह्यात ३५०० कृषी प्रक्रिया उद्योग सुरू असल्याची नोंद आहे.उद्योगास चालना देण्यासाठी राज्य पुरस्कृत ‘मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना’ आणि केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री किसान संपदा योजना’ लागू केल्या आहेत. प्रत्यक्षात या योजनांचे अनुदान लोकप्रतिनिधींचे कार्यकर्तेच लाटत आहेत.योजना चांगल्या असूनही लाभार्थींना अनुदानच वेळेवर मिळत नसल्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीत अडचणी असल्याचे नवीन उद्योजकांनी सांगितले. उत्पादित मालास योग्य बाजारपेठही उपलब्ध नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरणारे आहे. ते रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्टची खा. संजयकाका पाटील यांनी घोषणा केली. पण, त्याची अंमलबजावणी झालीच नाही.2 सहकारी कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले. पण, ढिसाळ व्यवस्थापन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांमुळे ते उद्योग बंद पडले आहेत.3 कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होत आहेत. या नवीन उद्योजकांना मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळेही ते बंद पडत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग केंद्र आणि राज्य शासनाने स्वत: पुढाकार घेऊन वाढविण्याची गरज आहे. तरच शेतीचा विकास होण्यास मदत होईल.2कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी शासनाने वीज, जागा मोफत उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. तरच हे उद्योग वाढतील आणि टिकतील सुध्दा.3अनुदान देऊन कृषी प्रक्रिया उद्योग वाढणार नाहीत, तर ते वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने किमान दहा वर्षाचे धोरण आखण्याची गरज आहे. करामध्ये सवलत आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.