शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

काही वेळासाठी तरी व्यापाराला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:27 IST

सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास ...

सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शहा यांनी पत्रात म्हटले आहे की, मे महिन्याचा उर्वरित १५ दिवस राहिलेला सीझन तरी व्यावसायिक दृष्टीने व्यापारी बांधवांना मिळाला तर निदान खर्च, बँकेचे व्याज, हप्ते, कर्मचारी पगार या बाबतींत नियोजन करता येईल. व्यापारी समाजावर मोठे आर्थिक अरिष्ट आले आहे. त्यात जर लॉकडाऊन पुन्हा वाढला तर बाजारपेठ पूर्णतः संपुष्टात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे, याबाबत दुमत नाही; पण कुठंतरी यासोबत जगण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंगीकारून ठप्प झालेले अर्थचक्र नियमित करणे क्रमप्राप्त आहे.

सांगलीत २०१९ मध्ये आलेल्या भयंकर महापुरामुळे आधीच याठिकाणचा व्यापार अडचणीत आला आहे. त्यातून अजून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत सतत लॉकडाऊनला सामोरे जात आहोत. कोणतीही दिलासादायक ठोस मदत केंद्र, राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली नाही. कोणत्याही प्रकारे वित्तीय संस्थांकडून दिलासा मिळालेला नाही. स्थानिक पातळीवर साधी घरपट्टी-पाणीपट्टीसुद्धा माफ झाली नाही. अशा परिस्थितीत इथले व्यापारी बांधव हतबल आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून आम्ही व्यापार सुरू करण्याबाबत अनेक उपाययोजना सुचवू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने असोसिएशनला विश्वासात घेऊन निदान शहराअंतर्गत व्यापार सुरू ठेवण्यासाठी तरी मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.