शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काही वेळासाठी तरी व्यापाराला परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:27 IST

सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास ...

सांगली : येत्या १५ मेनंतर लॉकडाऊन न वाढवता जरूर त्या कडक उपाययोजना करून काही वेळासाठी तरी व्यापार सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शहा यांनी पत्रात म्हटले आहे की, मे महिन्याचा उर्वरित १५ दिवस राहिलेला सीझन तरी व्यावसायिक दृष्टीने व्यापारी बांधवांना मिळाला तर निदान खर्च, बँकेचे व्याज, हप्ते, कर्मचारी पगार या बाबतींत नियोजन करता येईल. व्यापारी समाजावर मोठे आर्थिक अरिष्ट आले आहे. त्यात जर लॉकडाऊन पुन्हा वाढला तर बाजारपेठ पूर्णतः संपुष्टात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे, याबाबत दुमत नाही; पण कुठंतरी यासोबत जगण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंगीकारून ठप्प झालेले अर्थचक्र नियमित करणे क्रमप्राप्त आहे.

सांगलीत २०१९ मध्ये आलेल्या भयंकर महापुरामुळे आधीच याठिकाणचा व्यापार अडचणीत आला आहे. त्यातून अजून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत सतत लॉकडाऊनला सामोरे जात आहोत. कोणतीही दिलासादायक ठोस मदत केंद्र, राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला मिळालेली नाही. कोणत्याही प्रकारे वित्तीय संस्थांकडून दिलासा मिळालेला नाही. स्थानिक पातळीवर साधी घरपट्टी-पाणीपट्टीसुद्धा माफ झाली नाही. अशा परिस्थितीत इथले व्यापारी बांधव हतबल आहेत. स्थानिक परिस्थिती पाहून आम्ही व्यापार सुरू करण्याबाबत अनेक उपाययोजना सुचवू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने असोसिएशनला विश्वासात घेऊन निदान शहराअंतर्गत व्यापार सुरू ठेवण्यासाठी तरी मार्ग काढावा, अशी मागणी केली आहे.