शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

‘म्हैसाळ’साठी रस्त्यावर उतरू अजितराव घोरपडे : शासनावर नाकर्तेपणाचा आरोप

By admin | Updated: May 14, 2014 00:10 IST

सांगली : गेल्या २० वर्षात म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकर्‍यांच्या दारात पोहोचू शकले नाही, याला लोकशाही म्हणायची का? शेतकर्‍यांनी वारंवार आंदोलने केली,

सांगली : गेल्या २० वर्षात म्हैसाळ योजनेचे पाणी शेतकर्‍यांच्या दारात पोहोचू शकले नाही, याला लोकशाही म्हणायची का? शेतकर्‍यांनी वारंवार आंदोलने केली, पण त्यांची साधी दखलही घेतली गेली नाही. शेतकर्‍यांनी न्याय मागायचा की नाही?, असा प्रश्न पडतो. या सार्‍याला शासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, असा घरचा आहेर देत, म्हैसाळच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. घोरपडे यांनी पाणीप्रश्न हाती घेत विधानसभेसाठी शड्डू ठोकल्याचे बोलले जात आहे. सांगलीतील पाटबंधारे भवनात म्हैसाळ योजनेंतर्गत येणार्‍या लाभधारक शेतकर्‍यांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेनंतर पत्रकारांशी बोलताना घोरपडे यांनी राज्य शासनावर आसूड ओढले. ते म्हणाले की, वीस वर्षापूर्वी म्हैसाळ योजनेला सुरूवात झाली. या कालावधित कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. पाटबंधारे खाते सांभाळणारे अजित पवार, शशिकांत शिंदे अनुशेषाचे कारण देत आहेत. वीस वर्षात अनुशेषाचा प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. म्हैसाळ योजनेला निधी मिळत नाही. त्यासाठी खासगीकरणाचा पर्यायही सुचविला होता. पण नाकर्त्या शासनाकडून त्यावर निर्णय घेतला नाही. म्हैसाळ योजनेतील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा जनतेला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)