शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

अनुशेषामुळे राज्यातील पाणी प्रकल्प रखडले अजित पवारांची खंत : कुंडलच्या क्रांती साखर कारखान्याच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन

By admin | Updated: May 9, 2014 00:14 IST

कुंडल : राष्टÑवादीकडे राज्यातील सर्वात महत्त्वाची खाती होती. तरीही राज्यातील पाणीप्रश्न अनुशेषाच्या अडचणींमुळे पूर्णपणे मार्गी लावता आले नाहीत,

 कुंडल : राष्टÑवादीकडे राज्यातील सर्वात महत्त्वाची खाती होती. तरीही राज्यातील पाणीप्रश्न अनुशेषाच्या अडचणींमुळे पूर्णपणे मार्गी लावता आले नाहीत, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (गुरुवारी) कुंडल येथील कार्यक्रमात व्यक्त केली. कुंडल येथे क्रांती कारखान्याच्या गाळपक्षमता व सहवीज निर्मिती प्रकल्पाचे विस्तारिकरण, क्रांती उपसा जलसिंंचन योजना व कुंडल जलस्वराज्य योजना या प्रकल्पांचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले की, साखर कारखान्यांनी इतर पूरक प्रकल्प उभारण्याची गरज आहे. कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभे करावेत. यामुळे उसाला जादा दर देता येईल. सध्या साखरेचे दर वाढत नाहीत. त्यामुळे उसाला जादा दर मिळत नाही. इथेनॉल प्रकल्प उभा करण्यासाठी क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड कारखान्यास सर्व ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण होणार्‍या विजेचा दर ६.५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. यंदा १ आॅक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे धोरण आहे. सहकारी साखर कारखान्यांना यापुढे सरकारी मदत मिळणार नाही. याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे स्रोत कमी होेत आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनचा जास्तीत जास्त वापर करावा. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादनाची गरज आहे. शेतकर्‍यांसमोर नवनवी संकटे येत आहेत. संकटे आली तरी शेतकर्‍यांनी खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, जी. डी. बापूंनी तत्त्वाचे राजकारण केले. तडजोड केली असती तर ते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले असते. परंतु सर्वसामान्य व गोरगरीब जनता सुखी रहावी यासाठी त्यांनी अहोरात्र कार्य केले. शेतकर्‍यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांची धडपड होती. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, तत्त्वांनी व विचारांनी वागले पाहिजे, ही भूमिका जी. डी. बापूंनी शिकवली. या परिसरात जिद्दीचे कार्यकर्ते असून, कार्यकर्त्यांत संघर्ष करण्याची भूमिका आहे. आ. बबनदादा शिंदे म्हणाले, अरुण लाड यांना पदवीधर मतदार संघातून उमेदवारी मिळावी, सोलापूर जिल्ह्यातून सर्व ते सहकार्य करू. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांना उमेदवारी द्यावी, सर्व ताकदीनिशी निवडून आणू. या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड म्हणाले, अनेक अडचणीतून कारखाना उभा राहिला. जी. डी. बापूंना अपेक्षित असणारे कार्य करण्याची गरज आहे. बेरोजगारी वाढली आहे. सर्वसामान्य व कष्टकर्‍यांच्या मुलांना तांत्रिक व उच्च शिक्षण मिळत नाही. बापूंचे कार्य पुढे नेण्यासाठी सहकार्य करा. चांगली पदवीधर मतदार नोंदणी केली आहे. पक्षाचे काम वाढवले आहे. पक्षाने कामाची संधी द्यावी. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, आ. रमेश शेंडगे, खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, जि. प. अध्यक्ष देवराज पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, विलासराव शिंदे, अनिल बाबर, उषाताई दशवंत, विनायक पाटील, संग्राम देशमुख, माणिकराव पाटील, अमरसिंह देशमुख किरण लाड, शरद लाड, उद्योगपती उदय लाड आदी उपस्थित होते. माजी जि. प. सदस्य कुंडलिक एडके यांनी आभार मानले. (वार्ताहर)