शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कृषी न्यायालये स्थापन करून शेतकऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार आणखी व्यापक करावा, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. याचवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांकडे पाठ फिरविल्याने राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे गल्ली पातळीवरचे राष्ट्रीय नेते राहिल्याचा चिमटा शेट्टी यांचे नाव न घेता काढला.

आ. खोत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीसमोर २० फेब्रुवारीपर्यंत सूचना दाखल करता येणार आहेत. बरेच शेतकरी किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी हे तीन कृषी कायदे पूर्णपणे अभ्यासलेले नाहीत. त्यातून सांगी-वांगी तर्क या कायद्यावर काढले जात आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमाल पूर्णपणे वगळणे गरजेचे आहे. शेतमालाच्या बाजारपेठेवरचा सरकारी हस्तक्षेप पूर्ण बाजुला झाला पाहिजे. लायसन परमिट राज संपले पाहिजे, अशी रयत क्रांती संघटनेची स्पष्ट भूमिका आहे.

ते म्हणाले, या कायद्यात भाजीपाल्याच्या घाऊक दरात शंभर टक्के दरवाढ झाल्यावर आणि नाशिवंत नसलेल्या शेतमालात ५० टक्के दरवाढ झाली की, सरकार हस्तक्षेप करणार आहे, ही जाचक अट आम्हाला मान्य नाही. शेतमालाचे कितीही भाव वाढले तरी सरकारने त्यांच्या गोदामात साठवणूक केलेले धान्य हे बाजारपेठेतील किमती स्थिर करण्यासाठी बाहेर आणावे. दुसऱ्या बाजुला आयात - निर्यात धोरण हे किमान ५ वर्षांचे असायला हवे.

खोत म्हणाले, दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणणारे आहे. ३२ वर्षांपूर्वी शरद जोशींनी महेंद्रसिंग टिकेत यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे विराट दर्शन घडविले होते. यावेळी टिकेत आणि त्यांच्याबरोबरच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोशी यांना मंचावरून खाली ढकलून देत नासधूस केली होती. आता ३२ वर्षांनंतर परत एकदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना टिकेत यांचा मुलगा राकेश हा या स्वातंत्र्याच्या आड आलेला आहे. शेतकरी सरकारच्या जोखडातून मुक्त झाला आणि शेती हा एक व्यवसाय म्हणून उदयाला आला तर शेतकऱ्यांच्या नावावरती शेतकऱ्यांचे नेते म्हणून टेंभा मिरवायला मिळणार नाही, हे खरे दु:ख शेतकरी नेत्यांच्या पोटामध्ये आहे. यावेळी लालासाहेब पाटील, विनायक जाधव, बजरंग भाेसले, सुजित डाळे उपस्थित होते.