शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कृषी न्यायालये स्थापन करून शेतकऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार आणखी व्यापक करावा, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. याचवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांकडे पाठ फिरविल्याने राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे गल्ली पातळीवरचे राष्ट्रीय नेते राहिल्याचा चिमटा शेट्टी यांचे नाव न घेता काढला.

आ. खोत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीसमोर २० फेब्रुवारीपर्यंत सूचना दाखल करता येणार आहेत. बरेच शेतकरी किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी हे तीन कृषी कायदे पूर्णपणे अभ्यासलेले नाहीत. त्यातून सांगी-वांगी तर्क या कायद्यावर काढले जात आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमाल पूर्णपणे वगळणे गरजेचे आहे. शेतमालाच्या बाजारपेठेवरचा सरकारी हस्तक्षेप पूर्ण बाजुला झाला पाहिजे. लायसन परमिट राज संपले पाहिजे, अशी रयत क्रांती संघटनेची स्पष्ट भूमिका आहे.

ते म्हणाले, या कायद्यात भाजीपाल्याच्या घाऊक दरात शंभर टक्के दरवाढ झाल्यावर आणि नाशिवंत नसलेल्या शेतमालात ५० टक्के दरवाढ झाली की, सरकार हस्तक्षेप करणार आहे, ही जाचक अट आम्हाला मान्य नाही. शेतमालाचे कितीही भाव वाढले तरी सरकारने त्यांच्या गोदामात साठवणूक केलेले धान्य हे बाजारपेठेतील किमती स्थिर करण्यासाठी बाहेर आणावे. दुसऱ्या बाजुला आयात - निर्यात धोरण हे किमान ५ वर्षांचे असायला हवे.

खोत म्हणाले, दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणणारे आहे. ३२ वर्षांपूर्वी शरद जोशींनी महेंद्रसिंग टिकेत यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे विराट दर्शन घडविले होते. यावेळी टिकेत आणि त्यांच्याबरोबरच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोशी यांना मंचावरून खाली ढकलून देत नासधूस केली होती. आता ३२ वर्षांनंतर परत एकदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना टिकेत यांचा मुलगा राकेश हा या स्वातंत्र्याच्या आड आलेला आहे. शेतकरी सरकारच्या जोखडातून मुक्त झाला आणि शेती हा एक व्यवसाय म्हणून उदयाला आला तर शेतकऱ्यांच्या नावावरती शेतकऱ्यांचे नेते म्हणून टेंभा मिरवायला मिळणार नाही, हे खरे दु:ख शेतकरी नेत्यांच्या पोटामध्ये आहे. यावेळी लालासाहेब पाटील, विनायक जाधव, बजरंग भाेसले, सुजित डाळे उपस्थित होते.