शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त ...

इस्लामपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलनाला भीक न घालता कृषी कायद्यामध्ये शेतकऱ्यांना व्यापक स्वातंत्र्य देऊन शेतकऱ्यांप्रती आपुलकीची भावना व्यक्त करावी. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेष कृषी न्यायालये स्थापन करून शेतकऱ्यांना दाद मागण्याचा अधिकार आणखी व्यापक करावा, असे मत आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. याचवेळी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनांकडे पाठ फिरविल्याने राष्ट्रीय पातळीवरचे नेते हे गल्ली पातळीवरचे राष्ट्रीय नेते राहिल्याचा चिमटा शेट्टी यांचे नाव न घेता काढला.

आ. खोत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यांच्या समितीसमोर २० फेब्रुवारीपर्यंत सूचना दाखल करता येणार आहेत. बरेच शेतकरी किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांनी हे तीन कृषी कायदे पूर्णपणे अभ्यासलेले नाहीत. त्यातून सांगी-वांगी तर्क या कायद्यावर काढले जात आहेत. अत्यावश्यक वस्तूंच्या कायद्यातून शेतमाल पूर्णपणे वगळणे गरजेचे आहे. शेतमालाच्या बाजारपेठेवरचा सरकारी हस्तक्षेप पूर्ण बाजुला झाला पाहिजे. लायसन परमिट राज संपले पाहिजे, अशी रयत क्रांती संघटनेची स्पष्ट भूमिका आहे.

ते म्हणाले, या कायद्यात भाजीपाल्याच्या घाऊक दरात शंभर टक्के दरवाढ झाल्यावर आणि नाशिवंत नसलेल्या शेतमालात ५० टक्के दरवाढ झाली की, सरकार हस्तक्षेप करणार आहे, ही जाचक अट आम्हाला मान्य नाही. शेतमालाचे कितीही भाव वाढले तरी सरकारने त्यांच्या गोदामात साठवणूक केलेले धान्य हे बाजारपेठेतील किमती स्थिर करण्यासाठी बाहेर आणावे. दुसऱ्या बाजुला आयात - निर्यात धोरण हे किमान ५ वर्षांचे असायला हवे.

खोत म्हणाले, दिल्लीतील आंदोलन हे शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावर गदा आणणारे आहे. ३२ वर्षांपूर्वी शरद जोशींनी महेंद्रसिंग टिकेत यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे विराट दर्शन घडविले होते. यावेळी टिकेत आणि त्यांच्याबरोबरच्या गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोशी यांना मंचावरून खाली ढकलून देत नासधूस केली होती. आता ३२ वर्षांनंतर परत एकदा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवत असताना टिकेत यांचा मुलगा राकेश हा या स्वातंत्र्याच्या आड आलेला आहे. शेतकरी सरकारच्या जोखडातून मुक्त झाला आणि शेती हा एक व्यवसाय म्हणून उदयाला आला तर शेतकऱ्यांच्या नावावरती शेतकऱ्यांचे नेते म्हणून टेंभा मिरवायला मिळणार नाही, हे खरे दु:ख शेतकरी नेत्यांच्या पोटामध्ये आहे. यावेळी लालासाहेब पाटील, विनायक जाधव, बजरंग भाेसले, सुजित डाळे उपस्थित होते.