शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

ऐनवेळच्या ठरावाविरोधात आयुक्तांना साकडे

By admin | Updated: April 28, 2015 00:32 IST

महापालिका : सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी केली ठराव रद्दची मागणी

सांगली : महापालिकेच्या सभेत ऐनवेळच्या विषयात घुसडण्यात आलेले सर्व ठराव रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांनी आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे केली. महापौर विवेक कांबळे यांच्या कारभाराविरोधातील नाराजीतून त्यांनी आयुक्तांना याबाबतचे साकडे घातले. महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधाऱ्यांच्या दोन गटात जोरदार वाद सुरू झाला आहे. महापौर विवेक कांबळे यांचा एक गट, तर गटनेते किशोर जामदार यांचा दुसरा गट आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू केली आहे. महापौरांनी गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती संजय मेंढे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मिरज पॅटर्नचा प्रकार महापालिकेत चालू न देण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. दुसरीकडे महापौर कांबळेच किती भ्रष्ट आहेत, याचे पुरावे जामदार गट देत आहे. सभापती मेंढे यांनी काही दिवसांपूर्वी कांबळे यांच्या काळात झालेल्या ऐनवेळच्या ठरावांची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरू होते.या ठरावांविरोधात आता महापौरविरोधी गटाने आंदोलन उभारले आहे. सत्ताधारी गटातील ३१ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन सोमवारी आयुक्तांकडे सादर करण्यात आले. पंधरा नगरसेवकांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले. ऐनवेळचे सर्व ठराव बेकायदेशीर आहेत, त्यामुळे ते विखंडित करण्यात यावेत, अशापद्धतीने सदस्यांच्या अधिकारांवर गदा आणल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऐनवेळच्या ठरावांची माहितीही यामध्ये देण्यात आली आहे. आयुक्त कारचे यांनी सांगितले की, कायदेशीर बाबी पडताळून घेण्यात येतील. त्यानंतर ठरावांबाबत निर्णय घेतला जाईल. सभागृहाचे तसेच महापालिकेचे कामकाज या विषयावर नगरसेवकांची कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेवक दिलीप पाटील, निर्मला जगदाळे, बबिता मेंढे, शेवंता वाघमारे, सुनीता खोत, संतोष पाटील आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदन पाटील यांची बैठकसत्ताधारी गटात गोंधळ सुरू असल्याने काही तटस्थ नगरसेवकांनी, याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी सत्ताधारी गटाचे नेते मदन पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार मदन पाटील यांनी येत्या दोन दिवसात महापालिकेत बैठक घेऊन या वादावर चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. नेत्यांच्या बैठकीतही हे दोन गट आमने-सामने येणार असल्याने याठिकाणीही वादावादी होण्याची चिन्हे आहेत.टक्केवारीसाठीच महापालिकेत वाद : पतंगराव कदममहापालिकेतील संघर्षाबाबत सत्ताधारी गटाचे नेते आ. पतंगराव कदम म्हणाले की, टक्केवारीसाठीच महापालिकेत सध्या वाद सुरू आहेत. लोक हे सर्व पाहात आहेत. ज्या विश्वासाने लोकांनी सत्ता दिली आहे, त्याच विश्वासाने कारभार करण्याची गरज आहे. त्यांचा अपेक्षाभंग करू नये. अन्यथा ज्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतले, तेच तुम्हाला खाली खेचू शकतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सत्ताधारी गटाचा नेता म्हणून लक्ष घालणार आहे. लवकरच सत्ताधारी गटातील नगरसेवक बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल.महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी वाद घालण्यापेक्षा शहरातील विकास कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे.