शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा शंभर गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित

By admin | Updated: May 13, 2014 00:43 IST

ग्रामपंचायतींचे दुर्लक्षच : जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाईची गरज

सांगली : जिल्ह्यातील गावांमध्ये वारंवार दूषित पाण्याचे नमुने आढळून येऊनही त्यावर ग्रामपंचायतीचे प्रशासन ठोस उपाययोजना करीत नाही. जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडूनही दूषित पाणीपुरवठा करणार्‍या ग्रामपंचायतींवर कडक कारवाई होत नसल्यामुळे प्रत्येक महिन्याला पाणी नमुने तपासणीत त्याच त्या गावांची नावे येत आहेत. एप्रिल पाणी नमुने तपासणीत तर सर्वाधिक शंभर गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असून, लाखो ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे आजारांचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनासह जिल्ह्यातील मंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील एक हजार ५३१ ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले होते. यापैकी शंभर गावातील १७४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये अनेक मोठी गावे असूनही तेथील दूषित पाणी पुरवठ्याकडे ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत आहेत. आटपाडी तालुक्यातील कौठुळी, देशमुखवाडी, आटपाडी, भिंगेवाडी, बोंबेवाडी, लेंगरेवाडी, हिवतड, बाळेवाडी, तडवळे, गोमेवाडी, मानेवाडी, काळेवाडी, खरसुंडी, नेलकरंजी, औटेवाडी, वलवण, जत तालुक्यातील बेळुंखी, कुडणूर, अंकली, खैराव, टोणेवाडी, सोरडी, आसंगी, जाडरबोबलाद, लमाणतांडा, खंडनाळ, कुंभारी, धावडवाडी, वायफळ, बागलवाडी, मोकाशेवाडी, रेवनाळ, काराजनगी, पाच्छापूर, रावळगुंडवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील तिसंगी, मळणगाव, आरेवाडी, घोरपडी, नागज, रायवाडी, ढालेवाडी, दुधेभावी, सिध्देवाडी, कदमवाडी, इरळी, जांभूळवाडी, निमज, चुडेखिंडी, ढोलेवाडी, अलकूड एम, कोकळे, करलहट्टी, कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, मिरज तालुक्यातील आरग, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, पायापाचीवाडी, शिपूर, एरंडोली, बुधगाव, कवलापूर, खरकटवाडी, रसूलवाडी, इनामधामणी, पलूस तालुक्यातील सावंतपूर, दह्यारी, शिराळा तालुक्यातील शिराळा, सागाव, आरळासह १६ गावे, तासगाव तालुक्यातील बोरगाव, डोंगरसोनीसह आठ गावे, वाळवा तालुक्यातील भडकंबे, येलूर, पेठ, शिरगावसह १४ गावांमध्ये पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. येथील पाण्यामध्ये टाकण्यात येणारी टीसीएल पावडरही निकृष्ट दर्जाची असल्याची स्पष्ट झाले आहे. नेहमीप्रमाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दूषित पाण्याचे नमुने असणार्‍या गावांना नोटिसा बजाविल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र आजपर्यंत कधीच त्या गावांवर कारवाई झालेली नाही. (प्रतिनिधी)