शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हमीनंतर पुणदी योजना सुरू

By admin | Updated: March 22, 2016 00:58 IST

विसापूर-पुणदी योजनेची बैठक : नियोजनहीन कारभाराविरोधात तासगावात शेतकऱ्यांचा संताप

तासगाव : विसापूर आणि पुणदी उपसा सिंंचन योजनेतून लाभक्षेत्रातील गावांना नियोजन करुन पाणी दिले जात नाही. पाणी वाटपाचे धोरण निश्चित नाही. अधिकाऱ्यांच्या नियोजनहीन कारभारामुळेच पाण्यासाठी गावा-गावातील शेतकऱ्यांत भांडणे लागायची वेळ आली आहे, अशा शब्दात संताप व्यक्त करुन, नियोजनबध्द पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. विसापूर आणि पुणदी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी यापुढे पाणी योजनेच्या यंत्रणेत कोणताही हस्तक्षेप करणार नसल्याची हमी शेतकऱ्यांनी दिल्यानंतर, पुणदी योजना तातडीने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.शनिवारी रात्री पाणी सोडण्याच्या कारणावरुन पुणदी योजनेच्या टप्पा क्रमांक दोनवर आरवडे आणि लोढे, भैरववाडीच्या शेतकऱ्यांत वादावादी झाली होती. याच वादातून काही शेतकऱ्यांनी पंपहाऊसमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्याला धमकावून पाणी बंद केले होते. या प्रकारानंतर पुणदी योजना बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी विसापूर आणि पुणदी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक झाली. यावेळी खासदार संजयकाका पाटील, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले यांच्यासह पाणी योजनांचे अधिकारी, संबंधित गावांतील राजकीय पदाधिकारी, सरपंच, शेतकरी उपस्थित होते. खासदार संजयकाका पाटील यांनी, पाणी योजनेच्या बाबतीत मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. एखाद्या व्यक्तीच्या ‘मी’पणामुळे सर्व शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असेल, तर संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीत सर्वांनी मिळून प्रयत्न करुन पाणी वाटून घ्यायला हवे. तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळत नाही, त्यासाठी पाठपुरावा करायला हवा. पाणी नसलेल्या गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व्हे करु. पाणी देणे हे कुणा खासदार, मंत्र्याची मेहेरबानी नाही. पाणी सर्वांना मिळायला हवे. त्यासाठी अधिकारी आणि शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन नियोजन करा, असेही यावेळी खासदार पाटील यांनी सांगितले.पाणी योजनेचे अधिकारी नाडे यांनी, अधिकाऱ्यांच्या नियोजनात शेतकरी हस्तक्षेप करत असतील, तर यापुढे पाणी मिळणार नसल्याचा इशारा दिला. तसेच या योजनेचे पाणी हे शेतीसाठी आहे. पिण्यासाठी पाणी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सर्व पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी देण्याचे नियोजन होणार नाही. आधी पाणीपट्टी भरणाऱ्या गावाला पहिल्यांदा पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा बॅँकेचे संचालक प्रताप पाटील, बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य युवराज पाटील यांनीही शेतकऱ्यांची बाजू परखडपणे मांडली. अधिकाऱ्यांकडून पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन केले जात नाही. निश्चित धोरण नसल्यामुळे गावा-गावात वाद निर्माण होत आहेत. पाणी सोडताना ठोस निर्णय घेतला जात नाही. मिळणारे पाणी पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही. काही ठिकाणी ठराविक क्षेत्रालाच पाणी मिळते, तर काही गावांना पाणीपट्टी भरुनही पाणी मिळत नसल्याचे सांगितले. तर गौरगाव, पाडळी, धामणी, सावळजसह काही गावातील शेतकऱ्यांनी योजना पूर्ण नसल्यामुळे पाणी मिळत नाही. त्याची सोय करुन पाणी द्यावे, अशी मागणी केली. बैठकीत शेतकऱ्यांनी यापुढे पंपहाऊसमध्ये जाणार नाही, अशी हमी दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने बंद असलेला पुणदी योजनेचा पाणी पुरवठा सुरू केला. (वार्ताहर)पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या - अविनाश पाटीलदुष्काळामुळे सर्वांचीच शेती वाया चालली आहे. शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या. लोढे, सिध्देवाडी तलावात पिण्याच्या पाणी योजना आहेत; मात्र पाण्याअभावी योजना ठप्प आहेत. या योजनेत सहभागी असणाऱ्या काही गावांनी पाणीपट्टी भरलेली नाही. अशा गावांकडून पाणीपट्टी वसूल करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या, अशी मागणी बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी यावेळी केली....तर दीडपट पाणीपट्टी वसुली पाणी योजनेचा सर्वाधिक लाभ घेऊनही काही शेतकऱ्यांकडून जाणीवपूर्वक पाणीपट्टी भरली जात नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या. यावेळी पाणी योजनेचा सर्व्हे करून पाणी योजनेचा लाभ घेऊनही पाणीपट्टी भरत नसल्याचे आढळून आल्यास, अशा शेतकऱ्यांकडून सक्तीने दीडपट पाणीपट्टी वसूल करण्यात येईल, असा इशारा खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.