शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

सत्ताधाऱ्यांसह मातब्बरांचे अर्ज बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 00:14 IST

वसंतदादा कारखाना निवडणूक : छाननीत धक्का, वादावादी

सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यंदा विद्यमान संचालकांसह अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी गटाला बुधवारी धक्का बसला. कारखान्याला तीन वर्षे ऊस न दिल्याच्या कारणावरून सत्ताधारी गटासह विरोधी शेतकरी संघटना व अन्य इच्छुकांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारांमध्ये वादावादीही झाली. उमेदवारांच्या अर्जांची छाननी बुधवारी वादावादी, तक्रारी आणि नाराजी नाट्यात पार पडली. ही प्रक्रिया धक्कादायक ठरली. विद्यमान संचालक सचिन डांगे, विजयकुमार पाटील, महादेव कोरे यांचे, तर सत्ताधारी गटाचेच निश्चित मानले जाणारे उमेदवार गुंडातात्या चौगुले, बापूसाहेब शिरगावकर, राजेंद्र नीळकंठ पाटील, नारायण पाटील यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचेच पॅनेल होणे मुश्कील झाले आहे. शेतकरी संघटनेच्या कोरे यांच्यासह संंभाजी मेंढे, दिलीप पाटील, बाजार समितीचे सभापती कुमार पाटील, उपसभापती जीवन पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, अशा मातब्बरांचेही अर्ज उसाच्या नियमात बाद झालेउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत यातील ९0 उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. छाननी प्रक्रिया संपली तेव्हा ७७ उमेदवारांचे ९२ अर्ज शिल्लक राहिल्याचे चित्र होते. सत्ताधारी गटासह शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाले. आरक्षित जागांवरील उमेदवारांना उसाचा नियम लागू नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. उत्पादक गटातच सर्वाधिक उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीचे चित्रच बदलून गेले आहे. या निवडणुकीत आता कोणाचेही पॅनेल होऊ शकत नाही. उमेदवारी अर्जांची प्रक्रिया आरक्षित जागांच्या उमेदवारांपासून सुरू झाली. आरक्षित जागेवरील सर्वच्या सर्व ४0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर उत्पादक गटाची छाननी सुरू झाल्यानंतर सांगलीवाडीच्या प्रभाकर पांडुरंग पाटील यांच्या अर्जापासून वादाला सुरुवात झाली. त्यांचे नाव आष्टा गटात येत असताना, त्यांनी सांगली गटातून अर्ज दाखल केला होता. सूचकही सांगलीचाच घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यावेळी वाद झाल्यानंतर पुन्हा कारखान्याला सलग तीन वर्षे ऊस न दिल्याचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी त्यांचा अर्ज बाद ठरविला. त्यानंतर उसाच्या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज बाद होण्याचा सपाटाच सुरू झाला. त्यातून वादावादी, तक्रारी आणि रुसवा-फुगवीचा खेळ रंगला. बराच वेळ तीन वर्षे ऊस देण्याच्या नियमावलीवरून गोंधळ सुरू होता. आष्टेकर यांनी ९७ व्या घटना दुरुस्तीनुसार सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी आदर्श नियमावली लागू असल्याचे स्पष्ट केले. शेवटी त्यांनी निर्णय घेत छाननी प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण केली. (प्रतिनिधी)तन्ही पत्ते कटसांगली उत्पादक गटातून सत्ताधारी गटातर्फे गुंडा तात्या चौगुले यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांना पर्यायी उमेदवार म्हणून पंडित शंकर पाटील यांचा अर्ज, तर डमी उमेदवार म्हणून राहुल पाटील यांचा अर्ज दाखल केला होता. छाननीत हे तिन्ही अर्ज बाद ठरल्याने या गटातील उमेदवारीचा प्रश्न सत्ताधारी गटासमोर निर्माण झाला आहे. भिलवडीमध्येही अडचणीशेतकरी संघटनेचे दिलीप पाटील यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळणे निश्चित होते. मात्र, त्यांचाही अर्ज बाद झाला. याच गटातील आणखी काही अर्जही बाद झाले आहेत. ओबीसी गटात वादशेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांचा अर्ज बाद झाल्याने त्यांनी आता इतर मागासवर्गीय गटातून दावेदारी केली आहे. मात्र, याच गटात खासदार संजय पाटील गटाने अनिल कुत्ते यांचा अर्ज दाखल करून दावेदारी केली आहे. त्यामुळे बिनविरोधाच्या चर्चेवेळी यातील एका गटाची नाराजी सत्ताधारी गटाला सोसावी लागणार आहे. पूर्ण पॅनेलचे नियोजन सत्ताधारी गटाने केले होते. उमेदवारीबाबत प्राथमिक चर्चा होऊन अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांचे बहुतांश नियोजित उमेदवारच बाद झाल्याने पूर्ण पॅनेल होऊ शकत नाही. अनेक गटांमध्ये आता त्यांना उसनवारी करण्याची वेळ येणार आहे. शेतकरी संघटना किंवा हौसेखातर उभारलेल्या उमेदवाराला घेऊन गणित घालावे लागणार आहे. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच सत्ताधारी गट, अशा प्रकारे उमेदवारांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर बाद झाल्याने अडचणीत आला आहे.