शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मलेशियात अडकलेल्या तरुणांना दिलासा, वकील मिळाला : कागलच्या ‘सीईओं’चा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:09 IST

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे.

ठळक मुद्दे१२ डिसेंबरला तुरुंगातून सुटका होण्याची शक्यतापालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू,

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. नाईक मलेशियात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येत्या मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात न्यायालयीन प्रक्रिया राबवून या तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्र्कींग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. गुरुनाथ कुंभार याचे मेहुणे नामदेव कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर या तरूणांना भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

राज्यातील चार तरुण मलेशियात अडकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परराष्टÑ सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले. कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी शनिवारी या तरुणांना वकील मिळवून दिला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क भरण्यात आले आहे. या तरुणांची सुटका करण्यासाठी दोन टप्प्यात प्रक्रिया राबविली जाते. पण मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून एकाच टप्प्यात न्यायालयाची सर्व प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. येत्या मंगळवारी चारही तरुणांना मलेशियातील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यादिवशी सुटकेवर निर्णय आहे. सुटका होताच चारही तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्याची विनंती मुळे यांनी केली आहे.शहर पोलिसांचा तपास संथगतीनेकौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी, अजूनही शहर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. चार मुले मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात येऊनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवार यामध्ये मुख्य संशयित असल्याने पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीने सुरु असल्याची चर्चा आहे. पवारचा सुगावा लागत नसल्याचा पोलिस कांगावा करीत आहेत. पण तो दुसºयाच्या मोबाईलवरुन फसगत झालेल्या तरुणांच्या पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू, असे सांगत आहे.