शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात अडकलेल्या तरुणांना दिलासा, वकील मिळाला : कागलच्या ‘सीईओं’चा पुढाकार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:09 IST

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे.

ठळक मुद्दे१२ डिसेंबरला तुरुंगातून सुटका होण्याची शक्यतापालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू,

सांगली : नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तीन तरुणांना शनिवारी कागल (जि. कोल्हापूर) येथील प्रवीण नाईक यांच्या पुढाकारामुळे वकील मिळाला आहे. नाईक मलेशियात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी येत्या मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी एकाच टप्प्यात न्यायालयीन प्रक्रिया राबवून या तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

सांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ सदानंद पवार व धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ इरण्णा कुंभार (वय २०, रा. शिरवळ, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर), मोहन अशोक शिंदे (रा. बेलवंडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर), दीपक लिंबाजी माने (रा. मानेवाडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (रा. जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले.

मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली. पण वर्र्कींग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली. सध्या हे तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत. गुरुनाथ कुंभार याचे मेहुणे नामदेव कुंभार (रा. इस्लामपूर) यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर या तरूणांना भारतात परत आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आहेत.

राज्यातील चार तरुण मलेशियात अडकल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच परराष्टÑ सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी या तरुणांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु ठेवले. कागल येथील प्रवीण नाईक हे मलेशियात मुुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून या तरुणांना सोडविण्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु करण्याची विनंती केली. त्यानुसार नाईक यांनी शनिवारी या तरुणांना वकील मिळवून दिला. तसेच न्यायालयीन प्रक्रियेचे शुल्क भरण्यात आले आहे. या तरुणांची सुटका करण्यासाठी दोन टप्प्यात प्रक्रिया राबविली जाते. पण मुळे यांनी नाईक यांच्याशी संपर्क साधून एकाच टप्प्यात न्यायालयाची सर्व प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. येत्या मंगळवारी चारही तरुणांना मलेशियातील न्यायालयात उभे केले जाणार आहे. यादिवशी सुटकेवर निर्णय आहे. सुटका होताच चारही तरुणांना भारतीय दुतावासाच्या ताब्यात घेण्याची विनंती मुळे यांनी केली आहे.शहर पोलिसांचा तपास संथगतीनेकौस्तुभ पवार व धीरज पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन चार दिवस होऊन गेले तरी, अजूनही शहर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश आले नाही. चार मुले मलेशियाच्या तुरुंगात अडकल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात येऊनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे चित्र आहे. पोलिसपुत्र कौस्तुभ पवार यामध्ये मुख्य संशयित असल्याने पोलिसांचा तपास अत्यंत संथगतीने सुरु असल्याची चर्चा आहे. पवारचा सुगावा लागत नसल्याचा पोलिस कांगावा करीत आहेत. पण तो दुसºयाच्या मोबाईलवरुन फसगत झालेल्या तरुणांच्या पालकांशी संपर्क साधून पोलिस ठाण्यातील तक्रार मागे घ्या, तुमच्या मुलांना सोडवून आणू, असे सांगत आहे.