शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

प्रशासकीय संघर्षात जिल्हा वेठीस , तहसीलदाराची लिपिकास मारहाण प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:37 IST

सांगली : वाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील यांनी कर्मचाºयास केलेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील तलाठ्यांसह १२०० महसूल कर्मचाºयांचे गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत काम

ठळक मुद्देदाखल्यांसह कामकाज ठप्प; तोडगा काढण्याबाबत उदासीनतादोषींवर निश्चित कारवाई, मात्र जनतेची गैरसोय टाळा : विजय काळम-पाटीलतलाठी, ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कारभाराला खीळत्रिसदस्य समितीचा अहवाल : आज येणार

सांगली : वाळव्याचे तहसीलदार नागेश पाटील यांनी कर्मचाºयास केलेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील तलाठ्यांसह १२०० महसूल कर्मचाºयांचे गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. तहसीलदार आणि कर्मचाºयांच्या संघर्षात जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. जनतेचे हाल थांबविण्यासाठी खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनाने तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इस्लामपूर येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी तहसीलदार नागेश पाटील यांनी लिपिक सुनील विठ्ठल साळुंखे यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचाºयांनी बुधवारपासूनच बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अधिकाºयाने कर्मचाºयास शिवीगाळ करणे आणि मारहाणीचा प्रकार निंदनीय असून, या प्रश्नावर महसूल कर्मचाºयांनी तहसीलदार पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. संबंधित लिपिकाने प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केला, तर त्याच्यावर प्रशासकीय कारवाईचे अधिकार तहसिलदारांना आहेत. त्याच्यावर हात उगारणे आणि अर्वाच्य भाषा वापरणे योग्य नसल्याचा सूर उमटत आहे.

तहसीलदार आणि महसूल कर्मचाºयांमधील संघर्षावर जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दोनवेळा संघटनांशी मध्यस्थी करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. चौकशी करून तहसीलदारांवर कारवाई करण्याचेही त्यांनी ठोस आश्वासन दिले होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाºयांनी केलेली चर्चाही फिसकटली असल्यामुळे आंदोलन चालूच आहे. तोडगा निघाला नसल्यामुळे जिल्ह्यातील महसूलचे कामकाज सहा दिवसांपासून ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील जनता तहसील, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कामकाजासाठी फेºया मारत आहे.

कर्मचारी संपावर असल्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प आहे. तहसीलदार आणि कर्मचाºयांच्या संघर्षात जिल्ह्यातील २८ लाख जनतेला त्रास होत असून अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संघर्षात जनता वेठीस धरली जात आहे. याचा राज्य शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.शिस्त लावणारा विभाग म्हणून महसुलकडे पाहिले जाते. त्याच विभागाचा बेशिस्त कारभार सध्या चालू असल्यामुळे सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे. शासकीय नोकरी, प्रशासकीय कामकाजासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या सहीच्याच उत्पन्न, जातीच्या दाखल्यांची आवश्यकता आहे. पण कर्मचारीच नसल्यामुळे दाखल्यांची प्रक्रिया कोण राबविणार?, असाही प्रश्न निर्माण होत आहे. येथेही जनतेची अडवणूक होत असून यावर ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.

कर्मचारी रोज तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असूनही ते काहीही कामकाज करीत नाहीत. याचा सर्वाधिक फटका लोकांना बसत आहे. आंदोलन असेच चालू राहिले तर त्याचा जिल्ह्याच्या विकास कामावरही परिणाम होणार आहे. जिल्हा नियोजनचा निधी वाटपासह विकास कामांना मंजुरी देण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्रिसदस्य समितीचा अहवाल : आज येणारमारहाण प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, कडेगावचे प्रभारी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. ही समिती मंगळवारी दिवसभर इस्लामपूर तहसील कार्यालयात तहसीलदार अािण लिपिकाकडे चौकशी करत होती. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. बुधवार दि. १३ रोजी जिल्हाधिकाºयांना अहवाल मिळणार असून तो लगेच विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर कारवाई होणार आहे.दोषींवर निश्चित कारवाई, मात्र जनतेची गैरसोय टाळा : विजय काळम-पाटीलमारहाण प्रकरणाबद्दल त्रिसदस्य समिती चौकशी करीत असून तो अहवाल बुधवारी मिळणार आहे. तो अहवाल लगेच विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. संबंधित दोषींवर निश्चित कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तोपर्यंत प्रशासकीय कामकाज बंद पाडून महसूल कर्मचाºयांनी लोकांना वेठीस धरू नये. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घेऊन कामकाज सुरू करावे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी दिली.इस्लामपूरच्या तहसीलदारांची जिल्ह्याबाहेर बदली करा : राजू पाटीलतहसीलदार पाटील यांनी लिपिक साळुंखे यांना मारल्याचे सर्वांना माहीत आहे. मात्र पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली करून त्यांची चौकशी केली जात नाही. प्रशासनाने संघटनांशी बोलून तोडगा काढला असता, तर एवढे दिवस आंदोलन सुरू राहिले नसते. लोकांचीही गैरसोय झाली नसती. तहसीलदारांवर शासनाने कारवाई केली नसल्यामुळे आंदोलन सुरू ठेवले आहे. यात कर्मचाºयांचा दोष नाही, अशी प्रतिक्रिया महसूल संघटनेचे राजू पाटील यांनी दिली.तलाठी, ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कारभाराला खीळगावाचा कारभार सुरळीत चालविण्यात तलाठी आणि ग्रामसेवक ही दोन प्रशासकीय पदे महत्त्वाची आहेत. तहसीलदारांनी लिपिकास मारल्यामुळे तलाठी संपावर आहेत, तर दुसºया बाजूला जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करून ग्रामसेवकांचेही असहकार आंदोलन सुरू आहे. या दोन्ही कर्मचाºयांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन चालू केले आहे. पण, गावाच्या प्रशासनातील प्रमुख दोन्ही विभागाच्या कर्मचाºयांनी संप केल्यामुळे गावाचा कारभारच ठप्प झाला आहे.