शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

By अशोक डोंबाळे | Updated: September 1, 2023 17:04 IST

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे.

सांगली : शेतीला अखंडित सहा तासही वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून अधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मागणीपेक्षा कमी वीज घेऊन शेतकऱ्यांवर जादाचे भारनियमन लादले जात आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले की, पाटबंधारे विभागाने उपसाबंदी जाहीर केल्यामुळे कृषी पंपांची वीज बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरसा पाऊस न झाल्यामुळे सध्या पिके वाळू लागली आहेत. शेतीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आपल्या विभागाकडून वारंवार शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झालेले आहे.

काही भागामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. राज्यात सरासरी २५ हजार मेगावॅटची गरज आहे. सध्या २७ हजार मेगावॅटपर्यंत मागणी वाढली आहे. दोन हजार मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी भारनियमन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मार आंदोलन केले. यावेळी रमेश शेडेकर, बाळासाहेब पाटील, वसंत हौन्जे, डिसले गुरुजी, आबा आवटी, रावसाहेब पाटील, कुमार मगदूम, सुहास गाडवे आदी उपस्थित होते.शेतीला अखंडित आठ तास वीज द्या

शेतीपंपांना अखंडित आठ तास विजेचा पुरवठा मिळाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपंपाला जादा भारनियमन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली