शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

By अशोक डोंबाळे | Updated: September 1, 2023 17:04 IST

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे.

सांगली : शेतीला अखंडित सहा तासही वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून अधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मागणीपेक्षा कमी वीज घेऊन शेतकऱ्यांवर जादाचे भारनियमन लादले जात आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले की, पाटबंधारे विभागाने उपसाबंदी जाहीर केल्यामुळे कृषी पंपांची वीज बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरसा पाऊस न झाल्यामुळे सध्या पिके वाळू लागली आहेत. शेतीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आपल्या विभागाकडून वारंवार शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झालेले आहे.

काही भागामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. राज्यात सरासरी २५ हजार मेगावॅटची गरज आहे. सध्या २७ हजार मेगावॅटपर्यंत मागणी वाढली आहे. दोन हजार मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी भारनियमन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मार आंदोलन केले. यावेळी रमेश शेडेकर, बाळासाहेब पाटील, वसंत हौन्जे, डिसले गुरुजी, आबा आवटी, रावसाहेब पाटील, कुमार मगदूम, सुहास गाडवे आदी उपस्थित होते.शेतीला अखंडित आठ तास वीज द्या

शेतीपंपांना अखंडित आठ तास विजेचा पुरवठा मिळाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपंपाला जादा भारनियमन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली