शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगलीत शेतकऱ्यांनी मारले महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे

By अशोक डोंबाळे | Updated: September 1, 2023 17:04 IST

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे.

सांगली : शेतीला अखंडित सहा तासही वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे पिके वाळू लागली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी शुक्रवारी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून अधिकाऱ्यांचा निषेध केला. तसेच अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मागणीपेक्षा कमी वीज घेऊन शेतकऱ्यांवर जादाचे भारनियमन लादले जात आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला.

स्वतंत्र भारत पक्षातर्फे सांगलीत महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर यांना मागण्याचे निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले की, पाटबंधारे विभागाने उपसाबंदी जाहीर केल्यामुळे कृषी पंपांची वीज बंद केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुरसा पाऊस न झाल्यामुळे सध्या पिके वाळू लागली आहेत. शेतीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. पाटबंधारे विभागाने कोयनेतून पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र आपल्या विभागाकडून वारंवार शेतीपंपाची वीज खंडित केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे ३० ते ४० टक्के नुकसान झालेले आहे.

काही भागामध्ये पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. राज्यात सरासरी २५ हजार मेगावॅटची गरज आहे. सध्या २७ हजार मेगावॅटपर्यंत मागणी वाढली आहे. दोन हजार मेगावॅटचा विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे महावितरणचे अधिकारी भारनियमन करत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मार आंदोलन केले. यावेळी रमेश शेडेकर, बाळासाहेब पाटील, वसंत हौन्जे, डिसले गुरुजी, आबा आवटी, रावसाहेब पाटील, कुमार मगदूम, सुहास गाडवे आदी उपस्थित होते.शेतीला अखंडित आठ तास वीज द्या

शेतीपंपांना अखंडित आठ तास विजेचा पुरवठा मिळाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपंपाला जादा भारनियमन करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली