शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खोटी माहिती दिल्यास जागेवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीवेळी अधिकारी, कर्मचाºयांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : अधिकाºयांनी झिरो पेंडन्सी अभियानात जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा गोष्टी आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीवेळी अधिकारी, कर्मचाºयांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल योजनेबाबत केलेल्या कामाची माहिती प्रोजेक्टरद्वारे विभागीय आयुक्तांना दिली. या कामाचे कौतुक करीत दळवी म्हणाले की, जिल्हा प्रशासनाची ही गती कौतुकास पात्र आहे. या अभियानात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न अधिकाºयांनी करावा. सत्य माहितीच द्यावी. कामास थोडा उशीर झाल्यास अपवादात्मक परिस्थितीत त्या गोष्टी सहनही केल्या जातील. मात्र खोटी माहिती जाणीवपूर्वक दिल्यास अशा अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई अटळ आहे. सध्या सुरू असलेले जिल्हा प्रशासनाचे काम हा टीमवर्कचा उत्कृष्ट नमुना आहे. यापुढेही हे टीमवर्क कायम राहिले पाहिजे. त्यामुळे कर्मचाºयांना कामाचा आनंद लुटण्याबरोबरच कौटुंबिक आयुष्यही आनंदाने लुटता येईल.लवकरच तालुकास्तरावर भेट देऊन या अभियानाची पाहणी करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर एक महिन्यापेक्षा जादा कालावधीचे, प्रांतस्तरावर २ महिन्यापेक्षा अधिक आणि जिल्हाधिकारी स्तरावर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ काम प्रलंबित राहू नये, याची दक्षता यापुढील काळात घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.जमिनींच्या आदेशाचे वाटपजिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी प्रदान करण्याच्या आदेशाचे वाटप बुधवारी विभागीय आयुक्तांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी एका प्रकल्पग्रस्ताने वीज कंपनीकडून कनेक्शन मिळत नसल्याची तक्रार मांडली. नियमाप्रमाणे नंबर येईल तेव्हा वीज मिळेल, असे उत्तर कंपनीचे अधिकारी देत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणून वीज कंपनीने प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने कनेक्शन द्यावे, याबाबत कंपनीशी शासनाचा पत्रव्यवहार होण्याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.नगरपालिका, ग्रामपंचायतींसाठीही अभियानझिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे अभियान आता नगरपालिका आणि ग्रामपंचायतींसाठीही राबविण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाºयांनीही त्यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन दळवी यांनी यावेळी केले.