शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त खते देणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:32 IST

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे ...

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे दिले.दरम्यान, विनंती करूनही वीज जोडण्या केल्या जात नसल्यावरून आमदारांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाºयांना धारेवर धरले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. या हंगामात शेतकºयांना अधिक सुविधा देऊन त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न केला पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार असल्याने योजनेचा प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत करा. शेतकºयांची हेतुपुरस्सर अडवणूक आणि फसवणूक करणाºया निविष्ठा विक्रेत्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची गय करू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.कृषी विभागाच्या आढाव्यावेळी पीक विमा योजनेची आकडेवारी न सांगता त्याचा शेतकºयांना लाभ कसा मिळेल याची माहिती देण्याची सूचना खा. संजयकाका पाटील यांनी केली.मूग व उडदाची विटा येथे खरेदी केंद्रे नसल्याबद्दल आ. अनिल बाबर यांनी मुद्दा उपस्थित केला. जे पिकते त्याठिकाणी खरेदी केंद्र उभारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी आ. शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, महावीर जंगटे, राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, सुरेश मगदूम आदी उपस्थित होते.पैसेवारीवर चर्चाआटपाडी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याच्या मुद्द्यावर आ. बाबर यांनी नाराजी व्यक्त केली. शेजारच्या माण, सांगोला, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना, आटपाडीचीच अधिक का लावण्यात आली? असा सवाल करत, पैसेवारी ठरविण्याचे काम पारदर्शी झाले नाही तरीही याचे खापर आमदारांवर फोडण्यात येत आहे, हे चुकीचे आहे. या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.