शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

भेसळयुक्त खते देणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:32 IST

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे ...

सांगली : खरीप हंगामाचे नियोजन करताना भेसळयुक्त बियाणे बाजारात येणार नाहीत व त्यांचा शेतकºयांकडून वापर होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. शेतकºयांना आगामी खरीप हंगामात गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्याची दक्षता घ्या, तसेच भेसळयुक्त बियाणे देऊन शेतकºयांचे नुकसान करणाºयांवर कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे दिले.दरम्यान, विनंती करूनही वीज जोडण्या केल्या जात नसल्यावरून आमदारांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाºयांना धारेवर धरले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील यांच्यासह आमदारांची उपस्थिती होती.देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकºयांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. या हंगामात शेतकºयांना अधिक सुविधा देऊन त्यांच्यावरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक विभागाने प्रयत्न केला पाहिजे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकºयांना नुकसानभरपाई मिळण्यास मदत होणार असल्याने योजनेचा प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत करा. शेतकºयांची हेतुपुरस्सर अडवणूक आणि फसवणूक करणाºया निविष्ठा विक्रेत्यांची तसेच त्यांच्या कंपन्यांची गय करू नका, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.कृषी विभागाच्या आढाव्यावेळी पीक विमा योजनेची आकडेवारी न सांगता त्याचा शेतकºयांना लाभ कसा मिळेल याची माहिती देण्याची सूचना खा. संजयकाका पाटील यांनी केली.मूग व उडदाची विटा येथे खरेदी केंद्रे नसल्याबद्दल आ. अनिल बाबर यांनी मुद्दा उपस्थित केला. जे पिकते त्याठिकाणी खरेदी केंद्र उभारण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी आ. शिवाजीराव नाईक, अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, महावीर जंगटे, राजेंद्र साबळे, मकरंद कुलकर्णी, सुरेश मगदूम आदी उपस्थित होते.पैसेवारीवर चर्चाआटपाडी तालुक्याची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याच्या मुद्द्यावर आ. बाबर यांनी नाराजी व्यक्त केली. शेजारच्या माण, सांगोला, खानापूर, कवठेमहांकाळ, जत, या तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असताना, आटपाडीचीच अधिक का लावण्यात आली? असा सवाल करत, पैसेवारी ठरविण्याचे काम पारदर्शी झाले नाही तरीही याचे खापर आमदारांवर फोडण्यात येत आहे, हे चुकीचे आहे. या प्रश्नावर कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.