शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर-कडेगावमध्ये ३५ बैलगाड्यांवर कारवाई : क्षमतेपेक्षा जादा ऊसवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:43 IST

एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर

ठळक मुद्देसापतीवर लोखंडी खिळे; पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाईषमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर

विटा : एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर केल्याने पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शनिवारी खानापूर व कडेगाव तालुक्यातील ३५ बैलगाडीचालकांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बऱ्याच कारखान्यांकडे बैलगाडीने ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस, बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राणीमित्रांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.

त्यामुळे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाच जिल्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. देवरे, प्राणी कल्याणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील हवालदार यांच्यासह नऊजणांच्या विशेष पथकाची नेमणूक करून अशा बैलगाडी चालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या पथकाने पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातून कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.

पथकाने शुक्रवारी सोनहिरा साखर कारखान्याच्या १६, तर शनिवारी विराज शुगरच्या १९ अशा ३५ बैलगाडीमालकांवर प्राणी क्रूरता अधिनियम १९६० नुसार विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने ऊस वाहतूक करणाºया बैलगाडी मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात ही मोहीम दि. २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.मोहीम तीव्र करू...साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारे बैलगाडी मालक नियमांचे पालन करीत नाहीत. अनेकवेळा आजारी व अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर होतो. वास्तविक एका बैलगाडीतून एक ते दीड टन वाहतुकीचा नियम असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जात आहे. त्यामुळे बैलांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने पाच जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेतली असून, त्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातून करण्यात आली असून, ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक बी. बी. देवरे यांनी सांगितले. 

बैलगाडीमुक्त कारखाने करणार...या कारवाईनंतर पथकाने सोनहिरा व विराज शुगर प्रशासनासमवेत बैठक घेतली. याबाबत बैलगाडी चालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच बैलांना क्रुरतेची वागणूक देऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे या पथकाने कारखाना व्यवस्थापनाला सांगितले. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा गळीत हंगाम आम्ही बैलगाडीमुक्त करणार असल्याचे पोलीस पथकाला सांगितले.