शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

खानापूर-कडेगावमध्ये ३५ बैलगाड्यांवर कारवाई : क्षमतेपेक्षा जादा ऊसवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:43 IST

एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर

ठळक मुद्देसापतीवर लोखंडी खिळे; पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाईषमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर

विटा : एका बैलगाडीतून जास्तीत-जास्त एक ते दीड टन ऊस वाहतूक करणे बंधनकारक असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे, बैलांना खीळे घालणे तसेच आजारी आणि अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर केल्याने पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकाने शनिवारी खानापूर व कडेगाव तालुक्यातील ३५ बैलगाडीचालकांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. बऱ्याच कारखान्यांकडे बैलगाडीने ऊस वाहतूक सुरू आहे. मात्र बैलगाडीत क्षमतेपेक्षा जास्त ऊस, बैलांना क्रूरतेची वागणूक देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राणीमित्रांनी प्रशासनाकडे केल्या होत्या.

त्यामुळे कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पाच जिल्ह्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बी. बी. देवरे, प्राणी कल्याणचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील हवालदार यांच्यासह नऊजणांच्या विशेष पथकाची नेमणूक करून अशा बैलगाडी चालकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या पथकाने पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातून कारवाईचा बडगा हाती घेतला आहे.

पथकाने शुक्रवारी सोनहिरा साखर कारखान्याच्या १६, तर शनिवारी विराज शुगरच्या १९ अशा ३५ बैलगाडीमालकांवर प्राणी क्रूरता अधिनियम १९६० नुसार विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने ऊस वाहतूक करणाºया बैलगाडी मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यात ही मोहीम दि. २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.मोहीम तीव्र करू...साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारे बैलगाडी मालक नियमांचे पालन करीत नाहीत. अनेकवेळा आजारी व अपंग बैलांचा ऊस वाहतुकीसाठी वापर होतो. वास्तविक एका बैलगाडीतून एक ते दीड टन वाहतुकीचा नियम असताना, क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरला जात आहे. त्यामुळे बैलांचे हाल होतात. या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने पाच जिल्ह्यात कारवाईची मोहीम हाती घेतली असून, त्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातून करण्यात आली असून, ही मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक बी. बी. देवरे यांनी सांगितले. 

बैलगाडीमुक्त कारखाने करणार...या कारवाईनंतर पथकाने सोनहिरा व विराज शुगर प्रशासनासमवेत बैठक घेतली. याबाबत बैलगाडी चालकांचे प्रबोधन करण्याबरोबरच बैलांना क्रुरतेची वागणूक देऊ नये, यासाठी प्रयत्न करावेत, असे या पथकाने कारखाना व्यवस्थापनाला सांगितले. त्यावेळी त्यांनी पुढील वर्षीचा गळीत हंगाम आम्ही बैलगाडीमुक्त करणार असल्याचे पोलीस पथकाला सांगितले.