शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आबा-काका गटात होणार धुमशान

By admin | Updated: October 5, 2015 00:05 IST

तासगाव तालुका ग्रामपंचायत निवडणूक : ३९ गावांत राजकीय हालचाली गतिमान--ग्रामपंचायतींचा रणसंग्राम

दत्ता पाटील -तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविण्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली गतिमान होताना दिसून येत आहेत. १ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानातून गावकारभाऱ्यांच्या अस्तित्वाबरोबरच तालुक्याच्या नेतृत्वाचा फैसलाही होणार आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपचे नेतेही सरसावले आहेत. बहुतांश ग्रामपंचायतींत तूर्तास तरी आबा आणि काका गटात दुरंगी लढत होईल, असेच चित्र आहे. पॅनेलची जुळवाजुळव करण्यापासून संभाव्य उमेदवारांच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सर्वच गटांकडून यंत्रणा राबविली जात असल्याचे दिसून येत आहे. तासगाव तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. १३ आॅक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचा एक नोव्हेंबरला फैसला होणार आहे.ही निवडणूक गावकारभाऱ्यांसाठी अस्तित्वाची ठरणारी आहेच, किंंबहुना नेत्यांचे राजकीय वर्चस्व दाखवून देणारी ठरणार आहे. बहुतांश ग्रामपंचायतींवर सद्यस्थितीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे आबा आणि काका गटाच्या माध्यमातून बहुतांश ग्रामपंचायतीत दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. विसापूर, गव्हाण, सावळजमध्ये राष्ट्रवादीअंतर्गत दोन गट आहेत. तसेच येळावी, नागाव कवठे, जुळेवाडी या गावांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. त्यामुळे या गावांत तिरंगी लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १२ गावे सरपंच पदासाठी आरक्षित आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ६, तर महिलांसाठी ७ गावे आरक्षित आहेत. अनुसूचित जातींसाठी ३, तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी २ गावांत सरपंचपद आरक्षित आहे. खुल्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित असणाऱ्या २१ गावांत मोठी चुरस आहे. तसेच आरक्षित जागांवर उमेदवार उभा करण्यासाठी सभाव्य उमेदवारांचे दाखले, कागदपत्रे गोळा करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची धावपळ सुरु असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: कंबर कसली आहे. नगरपालिकेपाठोपाठ ग्रामपंचायतींवर ताबा मिळवण्यासाठी खासदारांनी गावन्गाव पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी गळ टाकला जात आहे. दुसरीकडे आबा गटाकडूनही तालुक्यातील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यक्षेत्रातील गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीची हलगी चांगलीच तापली असून, लवकरच आरोप-प्रत्यारोपांनी हलगी वाजण्यास सुरुवात होणार आहे.या गावांवर नेत्यांचा फोकस या निवडणुकीत मोठ्या गावांवर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विशेष लक्ष आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मोठ्या गावांतील व्होट बँक नेत्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. त्यामुळे या निवडणुकीत सावळज, मांजर्डे, हातनूर, विसापूर, येळावी, कवठेएकंद या गावांवर सर्वच नेत्यांचा फोकस आहे. या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.निवडणूक गावांतील प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग : सावळज, विजयनगर, पेड, धामणी, गोटेवाडी, नागाव कवठे, कौलगे, धुळगाव, यमगरवाडी.सर्वसाधारण प्रवर्ग महिला : आळते, हातनूर, विसापूर, शिरगाव (वि.), निंंबळक, डोर्ली, वज्रचौंडे, तुरची, गौरगाव, वाघापूर, वडगाव, दहीवडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग : सिध्देवाडी, पाडळी, येळावी, राजापूर, लोकरेवाडी, जुळेवाडी.नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : नरसेवाडी, लोढे, मोराळे, कवठेएकंद, जरंडी, गव्हाण, धोंडेवाडी.अनुसूचित जाती : बोरगाव, मांजर्डे, डोंगरसोनी.अनुसूचित जाती महिला : हातनोली, ढवळी.