शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आबा-काका गट भिडणार

By admin | Updated: May 29, 2017 23:19 IST

आबा-काका गट भिडणार

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. गावा-गावात व भावा-भावात आबा-काका गटाचा पुन्हा संघर्ष धुमसणार आहे. मणेराजुरी, आरवडे, वायफळे, उपळावी, कुमठे, अंजनी, चिंचणी, शिरगाव या बड्या गावांचा यामध्ये समावेश आहे. भाजपने नगरपालिका ताब्यात ठेवली. मात्र सेनापतीशिवाय लढणाऱ्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पालिका पराजयाचा वचपा काढला. गावोगावी मे महिन्यातील उन्हाप्रमाणे राजकीय वातावरण तापत आहे. मतदारांची किरकोळ कामे करीत ‘लक्ष राहू द्या’ असे मतदाराला सांगितले जात आहे.राजकारणासाठी तासगाव तालुका राज्यभरात संवेदनशील म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री आर. आर. आबा व खा. संजयकाका यांचा जीवघेणा राजकीय संघर्ष तर कमालीचा टोकाचा होता. दोन्ही गटाचे राजकारण घरा-घरात, भावा-भावात शिरून गाव, घरे जळाली. दोन एकाच आईची पोरं राजकारणानं एकमेकांचा जीव घ्यायला उठली. आबांच्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था सेनापती नसलेल्या सैन्यागत होती. बडे बडे मोहरे पक्ष सोडून काका गटात गेले. मात्र सेनापतीशिवाय आबांच्या सैन्याने बाजार समिती निवडणुकीत विजय मिळविला. नगरपालिका निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कमळ काकांनी तासगाव नगरपालिकेवर फुलविले.मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटात जोरदार चुरस झाली. काकांनी नेतेच उचलल्याने, राष्ट्रवादीला उमेदवार मिळतो की नाही, अशी अवस्था होती. पण गावोगावी कडवी लढत होऊन, खोटा आत्मविश्वास ठेवलेल्या भाजपचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराभव केला. राष्ट्रवादीने वादळात दिवा लावला.आता २६ ग्रामपंचायतींचा कार्यकाल डिसेंबरमध्ये संपत आहे. निवडणुकीची तयारी गावा-गावात सुरू झाली आहे. यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सता आहे. मात्र सत्ता मिळविण्यासाठी आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात आबा-काका गटाचा संघर्ष पुन्हा धुमसणार आहे.संवेदनशील गावे : राष्ट्रवादीची सत्ताचिंचणी, अंजनी, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, बेंद्री, भैरववाडी, कचरेवाडी, खुजगाव, कुमठे, लिंब, मणेराजुरी, नागाव, मतकुणकी, नागेवाडी, नेहरुनगर, निमणी, पुणदी, सावर्डे, शिरगाव, उपळावी, वंजारवाडी, वासुंबे, वायफळे, योगेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. ही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.