शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

आबा गटाचे एका दगडात दोन पक्षी!

By admin | Updated: August 11, 2015 22:20 IST

संजयकाका-जयंत पाटील युतीला दणका : तासगावचे उट्टे अन् कवठेमहांकाळात ‘चमत्कार’

दत्ता पाटील - तासगाव -एका दगडात दोन पक्षी मारण्याच्या बाबतीत एक म्हण प्रचलित आहे. मात्र त्याचे नेमके प्रत्यंतर तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा गटाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आणून दिले. तासगावात बाजार समितीच्या निवडणुकीत आबा-काका गटात झालेल्या मारहाणीचे उट्टे काढण्याचे काम आबा गटाने केलेच. त्याचबरोबर खासदार पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्या युतीमुळे आबा गटाचे खच्चीकरण करण्याच्या खेळीला दणका देण्याचा ‘चमत्कार’ आबा गटाने करून दाखविल्याचे दिसून येत आहे.लोकसभा निवडणुकीपासून खासदार संजय पाटील आणि आमदार आर. आर. पाटील यांच्यात टोकाचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर पाटील यांच्या निधनानंतर हा तणाव निवळल्यासारखी स्थिती निर्माण झाली असतानाच, पहिल्यांदाच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाडापाडीच्या राजकारणाने, तर तासगाव बाजार समिती निवडणुकीत हाणामारीच्या राजकारणाने आबा व काका गटातील तणाव चव्हाट्यावर आला. हाणामारीच्या घटनेनंतर अस्वस्थ झालेल्या आबा गटाच्या स्वाभिमानी कार्यर्त्यांनी तर सरळ-सरळ जयंत पाटील आणि संजय पाटील यांच्या युतीला दणका देण्याचीच भूमिका घेतली. काहींनी उघडपणे आमदार पतंगराव कदमांशी संधान साधले, तर काहींनी अप्रत्यक्षपणे आमदार कदम यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला. त्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पॅनेलच्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यावर कवठेमहांकाळ तालुक्यातील आबा गटाने तालुक्यात भक्कम असतानादेखील जयंत पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार पाडण्याचा चमत्कार घडवून आणल्याचे दिसून येत आहे.एकूणच तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकारणाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून भाजपशी सलगी करुन एक नवे वळण घेतले होते. आगामी काळात नवीन राजकीय समीकरणे तयार होतील, अशी चर्चाही होत होती. मात्र तासगाव बाजार समिती निवडणुकीत आणि आता पाठोपाठ सांगली बाजार समितीच्या निवडणुकीतील आबा गटाच्या भूमिकेने राजकारण पुन्हा जुन्याच वळणावर येऊन ठेपल्याचे दिसून येत आहे. अर्थात यामागे कारणे अनेक असली तरी, सध्या तरी सोशल मीडियावर आबाप्रेमींच्या होणाऱ्या चर्चेतून आबांच्या शिलेदारांनी एका दगडात जिल्ह्याच्या राजकारणात नव्याने स्थिरावू पाहणाऱ्या दोन पक्षांना दणका दिल्याचे बोलले जात आहे.यासाठी काढले आबा गटाने उट्टे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत तासगाव तालुक्यात आबा गटाच्या उमेदवाराचा खासदार संजयकाका पाटील यांच्या खेळीने पराभव झाला. मात्र त्याची फारशी दखल पॅनेलचे नेतृत्व करणारे आणि मतदारसंघाचे पालकत्व असणाऱ्या आमदार जयंत पाटील यांनी घेतली नाही.तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार गटाच्या कार्यकर्त्यांशी आबा गटाची धुमश्चक्री झाली. मात्र आमदार जयंत पाटील यांनी आबा गटातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा गांभीर्याने विचार न करता खासदार संजयकाकांशी असलेले सख्य कायम ठेवले.कवठेमहांकाळमध्ये आबा गटाची ताकद सर्वाधिक असतानादेखील निष्ठावंत आबा समर्थकांपैकी एकालाही आघाडीत उमेदवारी मिळाली नाही. याउलट खासदार गटाचे अस्तित्व नाममात्र असताना एक उमेदवारी त्यांच्या पदरात टाकली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासूनचा हा घटनाक्रम आबा समर्थकांच्या जिव्हारी लागणारा ठरला. त्यामुळेच कोणतीही ठरवून खेळी न करता कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तपणेच आमदार जयंत पाटील आणि खासदार संजय पाटील यांच्या युतीला दणका देण्याचे काम करून आबांच्या पश्चातही जिल्ह्याच्या राजकारणातील चुणूक दाखवून दिल्याची चर्चा होत आहे.