शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या वेळेअभावी संपर्क क्रांतीच्या स्वागताचा खोळंबा, प्रवासी संघटनातून संताप

By अविनाश कोळी | Updated: October 6, 2024 14:54 IST

सांगली, किर्लोस्करवाडीत थांबा असूनही गाडीचा संपर्क नाही...

सांगली : प्रदीर्घ संघर्षानंतर सांगली रेल्वे स्थानकाला संपर्क क्रांतीचा तर किर्लोस्करवाडीला निजामुद्दीन एक्सप्रेसचा थांबा मंजूर झाला. मात्र, या दोन्ही गाड्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांची वेळ मिळत नसल्याने या गाड्यांचा थांबा अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे सांगली व किर्लोस्करवाडीतील प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा तातडीने सुरु करण्याची मागणी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. त्याबाबतचे लेखी पत्रकही पाठविले होते. मात्र, प्रवासी संघटनांनी थांबा सुरु न होण्याच्या कारणांचा शोध घेतल्यानंतर गाडीच्या स्वागत सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे समाजमाध्यमांवर पालकमंत्र्यांबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संपर्क क्रांतचा थांबा सांगली व किर्लोस्करवाडीस मंजूर असतानाही रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी त्यांना तात्काळ पत्र पाठवावे. येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात रेल्वे अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणावा. संपर्क क्रांतीला रेल्वेमंत्र्यांनी २५ सप्टेंबरला सांगलीस थांबा मंजूर केला. त्याचवेळी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला किर्लोस्करवाडीत थांबा जाहीर झाला. या गाड्यांचा औपचारिक स्वागताचा सोहळा आयोजनाच्या हालचाली सुरु होत्या. गेल्या अकरा दिवसांपासून सांगलीच्या पालकमंत्र्यांना यासाठी वेळ मिळत नसल्याने अद्याप दोन्ही स्थानकावर थांबा सुरु झालेला नाही. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्यानंतर उद्घाटन होऊ शकणार नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याला मिळालेल्या संपर्क क्रांती गाडीपासून येथील प्रवाशांना मुकावे लागणार आहे.

पालकमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही -पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संपर्क क्रांतीबाबत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत त्यांची बाजू समजू शकली नाही.

रेल्वेमंत्र्यांच्या मंजुरी पत्राला ठेंगारेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंडीगड-यशवंतपूर संपर्क क्रांती व यशवंतपूर-चंदिगड संपर्क क्रांतीला सांगलीत थांबा मंजूर केल्याचे पत्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले होते. त्यांच्या आदेशालाही आता औपचारिक स्वागत सोहळ्यामुळे ठेंगा दाखविला गेला आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे