शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

शहरात ८00 अनधिकृत बांधकामे

By admin | Updated: March 25, 2015 00:41 IST

महापालिका क्षेत्रातील स्थिती : हार्डशीप प्रिमियम योजनेला प्रतिसाद नाही--लोकमत विशेष

शीतल पाटील - सांगली  मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीत सुमारे आठशे अनधिकृत बांधकामे आहेत. यात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सांगली शहरात आहेत. मध्यंतरी प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी ‘हार्डशीप प्रिमियम’ योजना लागू केली होती; पण त्यालाही बांधकाम व्यावसायिकांसह नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. पालिका हद्दीत मंजूर विकास नियमावलीनुसार बांधकाम परवाने दिले जातात; पण या नियमावलीलाच केराची टोपली दाखवून बिगर परवाना व नियमापेक्षा अधिक बांधकाम करण्याचा सपाटाच लावला गेला. रहिवासी क्षेत्रात उद्योग, व्यवसाय, रुग्णालये उभारली गेली. कित्येक अपार्टमेंटमध्ये पार्किंगच्या जागा हडप केल्या गेल्या. तरीही तत्कालीन प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतल्याने नियमबाह्य बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सांगलीत ५५०, कुपवाड व मिरजमध्ये २४६ अनधिकृत बांधकामे आहेत. विनापरवाना व नियमबाह्य बांधकामांना नियमांच्या अधीन राहून नियमितीकरण करण्यासाठी तत्कालीन आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी ‘हार्डशीप प्रिमियम’ योजना लागू केली. बेकायदा असलेल्या, पण कायदेशीर होऊ शकणाऱ्या बांधकामांना शुल्क, दंड आकारून ती नियमित करण्याचा प्रस्ताव होता. त्यातून २० ते २५ कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षाही होती.पण सांगली व कुपवाडचा सर्व्हे वेळेवर पूर्ण झालेला नाही, तर मिरजेत १८३ प्रकरणे निकालात काढून साडेचार कोटींचे उत्पन्न मिळविले होते. त्यानंतर मात्र या योजनेला बिल्डर, नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबलेली आहे. तीस हजार घरे बेकायदाशहरातील गुंठेवारी भागात सर्वाधिक बांधकामे बेकायदा आहेत. या परिसरात सुमारे ४० हजारहून अधिक घरे आहेत. गुंठेवारी नियमितीकरणातून त्यापैकी १० हजाराच्या आसपास घरे नियमित झाली आहेत. उर्वरित ३० हजार घरे बेकायदा ठरली आहेत. त्यामुळे भविष्यात या घरांवर कारवाईची शक्यता आहे. या घरांचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून तो शासनाकडे पाठविला आहे. पण अद्याप त्यावर राज्य शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. नियमितीकरण हाच त्यावर सध्या एकच उपाय आहे.गुंठेवारीला बेकायदाचा शापशहरातील बिल्डर व बड्या बांधकाम व्यावसायिकांनी अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. सर्वाधिक बेकायदा बांधकामे खासगी मालमत्ताधारकांनी उभारली आहेत. त्यात विस्तारित व गुंठेवारी भागात बेकायदा बांधकामांचा वेलू गगनावर पोहोचला आहे. पण प्रशासन तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही. बेकायदा बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचारीच नाहीत. त्यामुळे ना सर्व्हे, ना कारवाई, ना उत्पन्न असा कारभार सुरु आहे. गतवर्षी हार्डशिप योजनेतून पालिकेला साडेचार कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. जूनही ५० लाख रुपयांच्या दंडाच्या फायली प्रलंबित आहेत. कारवाईसाठी आवश्यक यंत्रणा, कर्मचाऱ्यांअभावी या योजनेची फलश्रुती होऊ शकलेली नाही. बांथकाम व्यावसायिक खासगी जागा मालकांकडून बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. त्यातच महापालिका प्रशासनही उदासीन आहे. त्यामुळे पालिकेला कोट्यवधीच्या उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे.