शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

जिल्ह्यात तीन वर्षांत ७८ रिव्हॉल्व्हर जप्त

By admin | Updated: February 25, 2015 00:02 IST

पोलिसांचा दणका : ९७ संशयितांना अटक

सांगली : गेल्या तीन वर्षांत पोलिसांनी एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल ७८ रिव्हॉल्व्हर जप्त केली आहेत. यामध्ये देशी, परदेशी बनावटीच्या व गावठी रिव्हॉल्व्हरचा समावेश आहे. पोलिसांच्या या कारवाईतून तब्बल ९७ संशयित रेकॉर्डवर आले आहेत. यातील अनेक संशयित रिव्हॉल्व्हरच्या तस्करीमध्ये गुरफटले असल्याने ते सातत्याने पोलिसांच्या हाती लागत आहेत. तस्करी रोखता येत नसली तरी, भविष्यात होणाऱ्या अनुचित प्रकारांना या कारवाईतून आळा बसेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या कारकीर्दीत बेकायदा शस्त्रे विशेषत: रिव्हॉल्व्हर जप्त करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. २०१३ मध्ये तब्बल ३६ रिव्हॉल्व्हर जप्त झाली होती. पोलिसांनी बिहारच्या एका तस्कराला सांगलीत पकडले होते. मात्र न्यायालयाकडून त्याला जास्त दिवस पोलीस कोठडी न मिळाल्याने तपास मुळापर्यंत गेला नाही. आतापर्यंतच्या सर्व कारवाईत पोलिसांचा तपास बिहार व उत्तर प्रदेशपर्यंत गेला आहे. गुन्हेगारी टोळ्यांसह काही तरुण शौक म्हणून रिव्हॉल्व्हर खरेदी करीत आहेत. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पाच-दहा हजाराला मिळणाऱ्या या रिव्हॉल्व्हरची सांगली परिसरात पाच ते साठ हजाराला विक्री केली जात आहे. काही गुन्हेगार व्यावसायिक म्हणून या तस्करीत गुंतले आहेत. दोन वर्षापूर्वी पोलीसप्रमुख सावंत यांनी रिव्हॉल्व्हर तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. अकरा रिव्हॉल्व्हर जप्त करुन २२ संशयितांना अटक केली होती. यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार सापडले होते. हे गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरसोबत काडतुसेही सापडतात. काडतुसे खराब होऊ नयेत म्हणून त्यांचा सराव करण्यासाठी गोळीबार केला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)कारवाईवर एक नजर...गेल्या तीन वर्षात सातत्याने रिव्हॉल्व्हर जप्त करण्याच्या कारवाया झाल्या आहेत. २०१२ मध्ये १६ रिव्हॉल्व्हर जप्त करुन २९ संशयितांना अटक केली होती. २०१३ मध्ये ३६ रिव्हॉल्व्हर, ४० संशयित, २०१४ मध्ये २३ रिव्हॉल्व्हर, ३६ संशयित, तर २०१५ च्या जानेवारीमध्ये ४ रिव्हॉल्व्हर जप्त करुन एका संशयितास अटक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करुनही आजही पोलिसांना शस्त्रे सापडतच आहेत. बिहार व उत्तर प्रदेशमधून तस्करी करुन ही शस्त्रे आणली जात असल्याचे तपासात यापूर्वीच निष्पन्न झाले आहे. मात्र पोलिसांच्या तपासाला मर्यादा पडत असल्याने या दोन राज्यांपर्यंत तपास पोहोचत नाही. परिणामी शस्त्रांची तस्करी आणि विक्री सुरूच आहे.