शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सांगलीतील ७७ टॉवर घरपट्टीतून सुटले

By admin | Updated: October 16, 2015 00:54 IST

महापालिकेचा कारभार : लाखो रुपयांच्या उत्पन्नावर सोडले पाणी

सांगली : शहरातील १०९ पैकी केवळ ३२ मोबाईल टॉवरलाच घरपट्टी लागू करण्यात आली आहे. उर्वरित ७७ टॉवरला कराची आकारणी केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असून, मोबाईल टॉवरवरील कारवाईही थंडावली आहे. सांगली शहरातील प्रभाग एकमध्ये ५२, प्रभाग दोनमध्ये ५७, कुपवाडमध्ये ६०, मिरजेत ४३ टॉवरची नगररचना विभागाकडे नोंद आहे. सांगली शहरात एकूण १०९ टॉवर आहेत. पण त्यापैकी केवळ ३२ टॉवरचीच घरपट्टी विभागाकडे नोंद आहे. महापालिकेच्याच दोन विभागातील टॉवरच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. केवळ ३२ टॉवरचाच कर वसूल केला जातो. त्यांच्याकडेही २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. मध्यंतरी मोबाईल टॉवरवर थकबाकीपोटी कारवाई सुरू करण्यात आली होती; पण आता ही कारवाईही बसनात गेली आहे. मोबाईल कंपन्या कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवित असताना महापालिका मात्र हक्काच्या उत्पन्नापासून वंचित आहे. याचे प्रशासनाला गांभीर्य दिसून येत नाही. केवळ कागदोपत्री कारवाईचा बडगा उगारला जातो. (प्रतिनिधी)महापालिका हद्दीतील मोबाईल टॉवरची माहिती संकलन करण्याचे काम सुरू आहे. नगररचना व घरपट्टी विभागातील आकडेवारीत तफावत आहे. आता प्रभागातील स्वच्छता निरीक्षक व नगरसेवकांची एकत्र बैठक घेऊन त्या त्या प्रभागातील मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करणार आहोत. त्यानंतर टॉवरवर कराची आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करू, असे स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी सांगितले.