शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

गतवर्षीपेक्षा कमी साठा : अंजनी तलाव ७५ टक्के रिक्त

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाला वरदान ठरलेला सिद्धेवाडी तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार नसल्याचे चित्र आहे. ३०२.९५ दशलक्ष घनफूट एवढी क्षमता असणाऱ्या सिद्धेवाडी तलावामध्ये आजअखेर २०२.६२ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पावसाच्या पाण्याने झालेला आहे. विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सिद्धेवाडी तलावामध्ये दाखल झाले. मात्र योजनेच्या उदघाटनापुरतेच पाणी तलावात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग पाणीसाठा वाढण्यात फारसा झालेला नाही. पावसाळा संपल्याने व अग्रणी नदी व ओढ्यांचे पाणी कमी झाल्यामुळे तलाव भरणार नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी चांगल्या पावसाने तलाव १०० टक्के भरला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तलाव ७२ टक्के भरला आहे.सिद्धेवाडी तलावामधून सध्या पेड प्रादेशिक, सावळज व परिसरातील गावांना पिण्यासाठी पाण्याच्या योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात झपाट्याने पाणी साठ्यात घट होणार आहे. शिवाय शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडून तलाव १०० टक्के भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.७४.१५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या अंजनी तलावामध्ये १८.०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. म्हणजे सध्या तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाटाच्या सहाय्याने पाणी अंजनी तलावामध्ये नेण्यात येते. मात्र सिद्धेवाडी तलावच यंदा न भरल्यामुळे अंजनी तलावात पाणी नेण्यात आलेले नाही. अंजनी तलावामध्येही म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची सोय आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अंजनी तलावात सोडून तलाव भरुन घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.गतवर्षी सिद्धेवाडी तलावातील पाणी तलावाखालील गावांना शेतीसाठी सोडत असताना वायफळे, सिद्धेवाडी, दहीवडी व बिरणवाडीतील शेतकऱ्यांनी विरोध करीत जॅकवेलमध्ये दगड टाकून पाणी अडवले होते. अगोदर सिद्धेवाडी तलावात पाणी आणा व मग खालील गावांना पाणी सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण आता विसापूर-पुणदी योजना पूर्ण होऊन पाणी आले होते. त्यामुळे योजनेचे पाणी सोडून तलाव भरल्यास त्याखालील गावांना पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचाही विरोध असणार नाही.निवडणुकीपुरतेच पाणी?डोळ्यासमोर विधानसभा निवडणुका ठेवून या योजनेचे काम गतीने करून उद्घाटन घेण्यात आले. मात्र त्यानंतर थोड्याच दिवसात या योजनेचे पाणी बंद झाले. त्यामुळे निवडणुकीसाठीच फक्त पाणी आले होते काय? असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.