शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

गतवर्षीपेक्षा कमी साठा : अंजनी तलाव ७५ टक्के रिक्त

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाला वरदान ठरलेला सिद्धेवाडी तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार नसल्याचे चित्र आहे. ३०२.९५ दशलक्ष घनफूट एवढी क्षमता असणाऱ्या सिद्धेवाडी तलावामध्ये आजअखेर २०२.६२ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पावसाच्या पाण्याने झालेला आहे. विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सिद्धेवाडी तलावामध्ये दाखल झाले. मात्र योजनेच्या उदघाटनापुरतेच पाणी तलावात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग पाणीसाठा वाढण्यात फारसा झालेला नाही. पावसाळा संपल्याने व अग्रणी नदी व ओढ्यांचे पाणी कमी झाल्यामुळे तलाव भरणार नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी चांगल्या पावसाने तलाव १०० टक्के भरला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तलाव ७२ टक्के भरला आहे.सिद्धेवाडी तलावामधून सध्या पेड प्रादेशिक, सावळज व परिसरातील गावांना पिण्यासाठी पाण्याच्या योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात झपाट्याने पाणी साठ्यात घट होणार आहे. शिवाय शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडून तलाव १०० टक्के भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.७४.१५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या अंजनी तलावामध्ये १८.०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. म्हणजे सध्या तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाटाच्या सहाय्याने पाणी अंजनी तलावामध्ये नेण्यात येते. मात्र सिद्धेवाडी तलावच यंदा न भरल्यामुळे अंजनी तलावात पाणी नेण्यात आलेले नाही. अंजनी तलावामध्येही म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची सोय आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अंजनी तलावात सोडून तलाव भरुन घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.गतवर्षी सिद्धेवाडी तलावातील पाणी तलावाखालील गावांना शेतीसाठी सोडत असताना वायफळे, सिद्धेवाडी, दहीवडी व बिरणवाडीतील शेतकऱ्यांनी विरोध करीत जॅकवेलमध्ये दगड टाकून पाणी अडवले होते. अगोदर सिद्धेवाडी तलावात पाणी आणा व मग खालील गावांना पाणी सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण आता विसापूर-पुणदी योजना पूर्ण होऊन पाणी आले होते. त्यामुळे योजनेचे पाणी सोडून तलाव भरल्यास त्याखालील गावांना पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचाही विरोध असणार नाही.निवडणुकीपुरतेच पाणी?डोळ्यासमोर विधानसभा निवडणुका ठेवून या योजनेचे काम गतीने करून उद्घाटन घेण्यात आले. मात्र त्यानंतर थोड्याच दिवसात या योजनेचे पाणी बंद झाले. त्यामुळे निवडणुकीसाठीच फक्त पाणी आले होते काय? असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.