शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सिध्देवाडी तलावात ७२ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: November 5, 2014 23:43 IST

गतवर्षीपेक्षा कमी साठा : अंजनी तलाव ७५ टक्के रिक्त

प्रवीण पाटील - सावळज -तासगाव पूर्व भागाला वरदान ठरलेला सिद्धेवाडी तलाव यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार नसल्याचे चित्र आहे. ३०२.९५ दशलक्ष घनफूट एवढी क्षमता असणाऱ्या सिद्धेवाडी तलावामध्ये आजअखेर २०२.६२ दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा पावसाच्या पाण्याने झालेला आहे. विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सिद्धेवाडी तलावामध्ये दाखल झाले. मात्र योजनेच्या उदघाटनापुरतेच पाणी तलावात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा उपयोग पाणीसाठा वाढण्यात फारसा झालेला नाही. पावसाळा संपल्याने व अग्रणी नदी व ओढ्यांचे पाणी कमी झाल्यामुळे तलाव भरणार नसल्याचे चित्र आहे. गतवर्षी चांगल्या पावसाने तलाव १०० टक्के भरला होता. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तलाव ७२ टक्के भरला आहे.सिद्धेवाडी तलावामधून सध्या पेड प्रादेशिक, सावळज व परिसरातील गावांना पिण्यासाठी पाण्याच्या योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात झपाट्याने पाणी साठ्यात घट होणार आहे. शिवाय शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणीही शेतकऱ्यांची होणार आहे. त्यामुळे विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडून तलाव १०० टक्के भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.७४.१५ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या अंजनी तलावामध्ये १८.०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. म्हणजे सध्या तलावात फक्त २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सिद्धेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाटाच्या सहाय्याने पाणी अंजनी तलावामध्ये नेण्यात येते. मात्र सिद्धेवाडी तलावच यंदा न भरल्यामुळे अंजनी तलावात पाणी नेण्यात आलेले नाही. अंजनी तलावामध्येही म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्याची सोय आहे. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे पाणी अंजनी तलावात सोडून तलाव भरुन घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.गतवर्षी सिद्धेवाडी तलावातील पाणी तलावाखालील गावांना शेतीसाठी सोडत असताना वायफळे, सिद्धेवाडी, दहीवडी व बिरणवाडीतील शेतकऱ्यांनी विरोध करीत जॅकवेलमध्ये दगड टाकून पाणी अडवले होते. अगोदर सिद्धेवाडी तलावात पाणी आणा व मग खालील गावांना पाणी सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांची होती; पण आता विसापूर-पुणदी योजना पूर्ण होऊन पाणी आले होते. त्यामुळे योजनेचे पाणी सोडून तलाव भरल्यास त्याखालील गावांना पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचाही विरोध असणार नाही.निवडणुकीपुरतेच पाणी?डोळ्यासमोर विधानसभा निवडणुका ठेवून या योजनेचे काम गतीने करून उद्घाटन घेण्यात आले. मात्र त्यानंतर थोड्याच दिवसात या योजनेचे पाणी बंद झाले. त्यामुळे निवडणुकीसाठीच फक्त पाणी आले होते काय? असा सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत.