शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

पाणी टंचाई कृती आराखड्यात ७१ गावे

By admin | Updated: March 26, 2015 00:05 IST

जत तालुका : ५४१ वाड्या-वस्त्यांचाही समावेश, एक कोटी साठ लाख खर्चाचा प्रस्ताव सादर

जयवंत आदाटे - जत तालुक्यातील ७१ गावे व ५४१ वाड्या-वस्त्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी साठ लाख ४८ हजार रुपये इतक्या खर्चाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या आराखड्याची १ एप्रिल ते ३0 जून या कालावधित अंमलबजावणी केली जाणार आहे.प्रतिवर्षी तालुक्यात १ जानेवारी ते ३१ मार्चअखेर संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करुन त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. परंतु सध्याच्या आर्थिक वर्षात येथे कमी प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने जानेवारी ते ३१ मार्चअखेरचा आराखडा तयार केला नाही.उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी, कूपनलिका, साठवण तलाव येथील पाण्याची पातळी वेगाने घटत आहे. कुडणूर व खोजनवाडी या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. तहसीलदार अभिजित पाटील-सावर्डेकर यांनी, या दोन गावांतील प्रस्ताव सर्वेक्षणासाठी पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे पाठविले असल्याचे सांगून, अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही तत्काळ होईल, अशी माहिती दिली.तात्पुरती उपाययोजना म्हणून खोजनवाडी येथील कूपनलिका अधिग्रहण करुन तेथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेंतर्गत पश्चिम भागातील एकोणीस गावात मुख्य कालव्यातून पाणी आले आहे. त्या परिसरातील पाणी टंचाई कमी तर तालुक्याच्या पूर्व आणि दक्षिण भागात पाणी टंचाई जाणवणार आहे. विहिरींचे अधिग्रहण अन् टँकरचे प्रस्ताव६७ गावे व त्याखालील ५४१ वाड्या-वस्त्यांसाठी ९४ विहिरींचे अधिग्रहण करुन संभाव्य पाणीटंचाईवर उपाय करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. यासाठी २७ लाख ४८ हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. ४९ गावे व त्याखालील ४३८ वाड्या-वस्त्यांवरील ५३ टँकरचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी एक कोटी तेहतीस लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.