शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

हेल्मेट, सीटबेल्टविना राज्यात ६ हजार ११८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यात २०२० मध्ये हेल्मेट व सीटबेल्ट नसल्याने ठार झालेल्यांची संख्या तब्बल ६ ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यात २०२० मध्ये हेल्मेट व सीटबेल्ट नसल्याने ठार झालेल्यांची संख्या तब्बल ६ हजार ११८ इतकी आहे. एकूण अपघाती मृत्यूत हे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. वाहनधारकांचा हेल्मेट व सीटबेल्टबाबत गाफिलपणा व पोलीस कारवाईची उदासीनता यामुळे या घटना वाढत आहेत.

राज्यात घडणाऱ्या एकूण अपघातात ४८ टक्के अपघात हे दुचाकींचे होत असल्याची बाब समोर आली आहे. मृत्यूमध्येही दुचाकीस्वारांचीच संख्या सर्वाधिक आहे. विना हेल्मेट सुसाट वेगाने वाहन चालविल्यामुळे दुचाकींचे अपघात वाढत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी नोंदविले आहे. राज्यातील सर्वाधिक अपघात हे शहरांतर्गत किंवा ग्रामीण रस्त्यांवर होत आहेत व याच मार्गांवर हेल्मेट व सीटबेल्टची कारवाई केली जात नाही. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत अशा प्रकारच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये सर्वप्रकारच्या अपघातांचे प्रमाण घटले असले तरी ते अद्याप चिंताजनक आहे.

चाैकट

सुरक्षासाधनांविना अपघाताचे तुलनात्मक आकडे

हेल्मटविना

वर्ष ठार गंभीर जखमी

२०१८ ५२५२ ६४२६

२०१९ ५३२८ ६४२७

२०२० ४८७८ ४८२७

सीटबेल्टविना

वर्ष ठार गंभीर जखमी

२०१८ १६५६ २९२१

२०१९ १६९७ २७२०

२०२० १२४० १७०७

अपघातात हेल्मेट नसल्याचा परिणाम

४३% ठार

४२% गंभीर जखमी

१५% किरकोळ जखमी

चौकट

हा काळ सर्वांत धोकादायक

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहिले तर दुपारी ३ ते ६ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक अपघात झाले आहेत. म्हणजेच या सहा तासांतच ३५ टक्के अपघात घडत आहेत. २०२० मध्येही असेच चित्र आहे.

चौकट

कोणत्या मार्गावर किती अपघात

मार्ग अपघात मृत्यू

एक्स्प्रेस वे १६१ ६६

राष्ट्रीय महामार्ग ६३४० ३४६२

राज्य महामार्ग ५५१८ २९७१

जिल्हा व अन्य १२९५२ ५०७०

चाैकट

हिट ॲण्ड रनचे ३ हजारांवर बळी

हिट ॲण्ड रनचे प्रमाण राज्यात अधिक आहे. २०२० मध्ये असे एकूण ६ हजार ४९ अपघात घडले. यात ३ हजार १६० लोकांचा जीव गेला. अतिवेगाने वाहन चालवून राज्यात वर्षभरात १९४१९ घटना घडल्या. यात ९ हजार १५२ लोकांचा बळी गेला आहे.