शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

सुएझमध्ये अडकले सांगलीतील द्राक्षाचे ६० कंटेनर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:25 IST

सांगली : पनामाचे मालवाहतूक जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात अडकून तिरके झाल्यामुळे जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्या कोंडीत ...

सांगली : पनामाचे मालवाहतूक जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात अडकून तिरके झाल्यामुळे जलवाहतूक ठप्प झाली आहे. त्या कोंडीत युरोप आणि रशियाकडे निघालेल्या सांगली जिल्ह्यातील द्राक्षाच्या ६० कंटेनरचा समावेश आहे. या कंटनेरमध्ये ९०० टन द्राक्षे असून त्यांची किंमत आठ कोटी १० लाखांपर्यंत आहे. रिकामे कंटेनरही परत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित द्राक्ष निर्यात खोळंबली आहे.

यंदा द्राक्ष निर्यातीसाठी जिल्ह्यातील ४६४४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील २२५६ हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्ष निर्यात सुरू आहे. त्यातील ६० टक्के द्राक्षांची ३५८ कंटनेरमधून युरोपमधील फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लिथुएनिया, नेदरलँड, स्पेन आदी देशांमध्ये निर्यात झाली आहे. सध्या सुएझ कालव्यात जलवाहतूक ठप्प झाल्याने जिल्ह्यातील खानापूर, मिरज, तासगाव तालुक्यातील ९०० टन द्राक्षे घेऊन जाणारे ६० कंटेनर अडकले आहेत. तेथे अडकलेले जहाज निघून वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत द्राक्षांचे कंटेनर समुद्रातच अडकून राहिल्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याशिवाय पूर्वी निर्यात झालेल्या मालाचे कंटेनर परत घेऊन येण्यासाठीचा मार्गही बंद आहे. यामुळे जिल्ह्यात शिल्लक असलेल्या ४० ते ३५ टक्के निर्यातक्षम द्राक्षाचे करायचे काय, असा प्रश्न भेडसावत आहे.

कोट

युरोपला जाण्यासाठी एकमेव जवळचा मार्ग सुएझ कालव्यातून जातो. तेथे अडकलेले जहाज सरळ होत नाही, तोपर्यंत युरोपची सर्वच निर्यात ठप्प होणार आहे. जिल्ह्यातील ६० कंटेनर अडकले असून, अजून १०० कंटेनर जाणार होते; पण रिकामे कंटेनरच नसल्यामुळे द्राक्षे पाठवायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

-संभाजी निकम, निर्यातदार, सावळज, ता. तासगाव.

चौकट

चीन, अरब राष्ट्रांची निर्यात सुरळीत

सौदी अरेबिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, ओमान, चीन, संयुक्त अरब अमिराती या मार्गावरील समुद्रातील मालवाहतूक सुरळीत सुरू आहे. यामुळे युरोपऐवजी या देशांमध्ये द्राक्ष निर्यातीची संधी आहे. शिल्लक द्राक्षाच्या निर्यातीसाठी तसे प्रयत्न केले तर शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल, असे द्राक्षउत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.