शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायती होणार नव्या वर्षात ‘हायटेक’

By admin | Updated: December 29, 2016 00:16 IST

आधुनिकतेच्या वाटेवर : बॅँकिंगसह पंचवीस प्रकारच्या सुविधा मिळणार

अशोक डोंबाळे ल्ल सांगलीजिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी ५३७ ग्रामपंचायतींमधून दि. १ जानेवारीपासून बॅँकिंगसह टीव्ही व मोबाईल रिचार्ज, विमा हप्ता भरणे, रेल्वे व बसचे आरक्षण या सेवा आणि १९ प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. केंद्र, राज्य सरकार आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. शंभर टक्के ग्रामपंचायतीमध्ये कॅशलेस व्यवहार सुरू होणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या निर्णयानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या सामान्य माणसालाही कॅशलेस व्यवहाराचे महत्त्व पटू लागले. केंद्र आणि राज्य सरकारने बहुतांश शासकीय कार्यालयांत कॅशलेस व्यवहार करण्यावर भर दिला. अर्थात अद्यापही अनेक शासकीय कार्यालयात कॅशलेस व्यवहार होत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने ‘आपलं सरकार सेवा केंद्र’ दि. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायतींपैकी ५३७ ग्रामपंचायतीत सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतींचा सर्वाधिक पुढाकार आहे. केंद्र शासनाचे सर्वसाधारण सुविधा महामंडळ (कॉमन सर्व्हिस सेंटर) या ग्रामपंचायतींना सर्व सहकार्य करणार आहे. अनेक ग्रामपंचायती दुर्गम भागात असल्यामुळे तेथे अखंडीत वीज आणि इंटरनेट सुविधा देण्यासाठी केंद्र शासनाने बीबीएनएल या संस्थेची नियुक्ती केली आहे. ग्रामपंचायतींना इंटरनेटची सुविधा देण्याचे काम सुरू आहे. नव्या वर्षात म्हणजे दि. १ जानेवारीपासून जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींचा कारभार ‘हायटेक’ होणार आहे. तेथे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. त्याचे मानधन ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर गावामध्ये बँकिंगच्या सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. ग्राहकांचे बँक खाते उघडणे, पैसे भरून घेणे आणि पैसे काढण्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. टीव्ही व मोबाईल रिचार्जही करता येणार आहे. गावातच विमान आणि रेल्वेचे आरक्षणही निश्चित करता येणार आहे. या सुविधांबरोबरच सात-बारा उतारा, उत्पन्न व रहिवासी दाखल्यांसह १९ प्रकारचे दाखलेही ग्रामपंचायतींमधून देण्यात येणार आहेत. उत्पन्न वाढणार : रवींद्र आडसूळजिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायतींमध्ये दि. १ जानेवारीपासून ‘आपलं सरकार सेवा केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. बॅँकिंगपासून सर्व सुविधा गावातील केंद्रामध्ये उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र आडसूळ यांनी दिली.वीस ग्रामपंचायतीत कॅशलेस व्यवहारआटपाडी तालुक्यातील दिघंची, घरनिकी, जत तालुक्यातील वज्रवाड, खोजानवाडी, कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग, शिरसगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, हिंगणगाव, मिरज तालुक्यातील हरिपूर, लिंगनूर, शिराळा तालुक्यातील पणुंब्रेतर्फ वारुण, भाटवाडी, पलूस तालुक्यातील कुंडल, सुखवाडी, तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, वाळवा तालुक्यातील शिरगाव, शिरटे, खानापूर तालुक्यातील पारे, नागेवाडी या वीस ग्रामपंचायतीत दोन दिवसात कॅशलेस व्यवहार सुरू होणार आहेत.