शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वसंतदादा बॅँक घोटाळ्यातील ५१ कर्मचाऱ्यांचे अर्ज फेटाळले

By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST

राज्यात सत्तापालट होताच विद्यमान सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन चौकशीवरील स्थगिती उठविली.

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या १७० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशीतून वगळण्याबाबत ५१ कर्मचाऱ्यांनी केलेले अर्ज मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी फेटाळून लावले. अन्य दोन कर्मचाऱ्यांनी दाखल केलेले वेगवेगळ््या मागणीचे तीन अर्जही फेटाळून लावण्यात आले. म्हणणे सादर करण्यासाठी उर्वरित माजी संचालक व कर्मचाऱ्यांना २२ जुलै अंतिम मुदत देण्यात आली आहे. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती. राज्यात सत्तापालट होताच विद्यमान सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन चौकशीवरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली आहे. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांच्या आक्षेपामध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. घोटाळ््याप्रकरणी ५१ कर्मचाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून चौकशीतून वगळण्याची मागणी केली होती. याबाबत चौकशी अधिकारी रैनाक यांनी सांगितले की, ७२ (२) अंतर्गत अद्याप खुलासा प्राप्त झालेला नाही. याशिवाय ७२ (३) नुसार आरोपपत्र व त्यानंतर ७२ (४) नुसार सुनावणी व जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया होण्यापूर्वीच या प्रकरणातून वगळण्याविषयीची मागणी कायद्यात बसत नाही. त्यामुळे हे अर्ज फेटाळण्यात येत आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील सुनावणीवेळी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. माधव वासुदेव गोगटे व मनोहर कावेरी यांनीही तीन अर्ज दाखल केले होते. यामध्ये त्यांनी विनामूल्य नकलांची मागणी, गोपनीय पत्रव्यवहाराची माहिती यासाठी अर्ज दाखल केले होते. त्यांचेही अर्ज फेटाळण्यात आले. सुनावणीसाठी २२ जुलै ही तारीख देण्यात आली असून, म्हणणे सादर न केलेल्या माजी संचालकांसह कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. मृत माजी संचालक बाजीरावआप्पा पाटील यांच्या वारसांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्याने याबाबतचा निर्णय आता पुढील सुनावणीवेळी होणार आहे.